शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

Maharashtra Political Crisis: शिवसेनेतील गळती सुरुच! ‘या’ २ जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक शिंदे गटात; नेत्यांना जबाबदारीही दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 17:19 IST

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील गळती थांबता थांबत नसून, सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवरही एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सुरूच आहे.

Maharashtra Political Crisis:एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेतून बंडखोरी केल्यापासून त्यांना राज्यभरातून दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच राज्यातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्त्यांसह, अनेक पदाधिकारी, नेते शिंदे गटात सामील झाले आहे. 

सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी, सध्या सुरू असलेले विधिमंडळाचे अधिवेशन, त्यात विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचे होत असलेले प्रयत्न या पार्श्वभूमीवरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सुरूच आहे. अहमदनगरसह मुंबईतील आणखी काही जणांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातून हा वाढता प्रतिसाद पाहता शिंदे गटाने नगर जिल्हा प्रमुख म्हणून महापालिकेतील नगरसेवक अनिल शिंदे यांची नियुक्ती जाहीर केली आहे. शिंदे यांनीच सर्वप्रथम शिंदे गटात प्रवेश केला होता आणि आतापर्यंतचे प्रवेश घडवून आणण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाऊन प्रवेश

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. मुंबईतील भांडुप विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक पाटील व त्यांची पत्नी आणि मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मीनाक्षी अशोक पाटील यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भेट घेऊन युती सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांच्यासोबत महिला उपविभाग संघटक राजश्री मांदविलकर, महिला शाखा संघटक सुरेखा पांचाळ, माजी शाखाप्रमुख कृष्णा शेलार, माजी शाखाप्रमुख विजय परब यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला, असे ट्विट एकनाथ शिंदेंनी केले. 

दरम्यान, अहमदनगर येथून आलेले तालुका प्रमुख विकास उर्फ बंडू रोहकले, पाडळीचे सरपंच हरीश दावभट, भाळवणीचे सरपंच बबन चेमटे, विकास सोसायटीचे चेअरमन ठकसेन रोहोकले, चेअरमन बाबासाहेब रोहकले, शाखाप्रमुख अक्षय रोहकले यांनी देखील याप्रसंगी युती सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी अनिल शिंदे यांची अहमदनगर जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासोबत खास नागपूरहून माझ्या भेटीसाठी आलेल्या दिव्यांग बांधवांना भेटून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नक्की प्रयत्न करू अशी ग्वाही एकनाथ शिंदेंनी यासमयी दिली. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे