शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

तोंडी परीक्षेमुळे फुगला दहावीचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 05:12 IST

८० : २० पॅटर्न : यंदा केवळ ४.७० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण; ८३ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शासनाच्या आदेशानुसार दहावीची परीक्षा ८० : २० पॅटर्ननुसार घेण्यात आली. त्यामुळे राज्य मंडळाचा यंदा दहावीचा निकाल विक्रमी लागला आहे. मागील वर्षी २८ हजार ५१६ विद्यार्थ्यांना ९० व त्यापेक्षा अधिक गुण मिळाले होते. मात्र, यंदा ही संख्या ८३ हजारांवर गेली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात तब्बल १८.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून अनेक शाळांकडून तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांना २० पैकी २० गुण दिले जात असल्याची ओरड केली जात होती. त्यामुळे गेल्या वर्षी दहावीचा निकाल केवळ ७७.१० टक्के लागला. त्यामुळे मार्च २०२० परीक्षेसाठी पुन्हा भाषा विषयास तोंडी परीक्षा व सामाजिक शास्त्रे आणि गणित विषयासाठी अंतर्गत मुल्यमापन परीक्षा घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. त्यानुसार घेतलेल्या परीक्षेमुळे यंदा ऐतिहासिक निकाल लागला.सर्व विषयांची १०० गुणांची परीक्षा घेतल्यामुळे मागील वर्षी एकाही विभागाचा निकाल ९० टक्क्यांच्या पुढे गेला नव्हता. परंतु, यंदा परीक्षा पद्धतीत बदल केल्यामुळे सर्व विभागांचा निकाल ९३ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. केवळ औरंगाबाद विभागाचा निकाल ९२ टक्के लागला. तसेच मार्च २०१९मध्ये राज्यातील केवळ २० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले. मात्र, यंदा २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे सवलतीचे गुण दिले जातात. यंदा सवलतीचा लाभ मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ८८ हजार १३१ एवढी आहे.च्मागील वर्षी १०० गुणांच्या लेखी परीक्षेमुळे २२.९० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. मात्र, यंदा केवळ ४.७० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे तोंडी परीक्षा व अंतर्गत मुल्यमापनामुळे निकाल फुगल्याचे बोलले जात आहे.दहावीत ९० टक्क्यांपेक्षा मिळाले अधिक गुणविभाग २०१९ २०२०पुणे ५,४३५ १५,४६६नागपूर १,३८५ ४,७२३औरंगाबाद ३,५०८ ८,२८२मुंबई ५,३९९ १४,७५कोल्हापूर ४,२०७ १२,६५१अमरावती २,७२५ ८,७१७नाशिक २,५०६ ८,१९२लातूर २,५९१ ८,००४कोकण ७६० २,४७१एकूण २८,५१६ ८३,२६२मराठी, इंग्रजीच्या टक्केवारीत वाढदहावीच्या परीक्षेत मराठी विषयाचा निकाल ९५. ७७ टक्के तर इंग्रजी विषयाचा निकाल ९४.५६ टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत मराठीच्या निकालात १७.३५ टक्क्यांनी तर इंग्रजीच्या निकालात १४.३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तोंडी परीक्षेमुळे भाषा विषयांचा निकाल वाढत असल्याचे दिसून येत आहे.शाळेचा निकाल १०० टक्के लागावा यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांना २० पैकी २० गुण दिले जातात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांची सवलतही दिली जाते. त्यामुळे भाषा विषयात उत्तीर्ण होण्यास विद्यार्थ्यांना खूप कमी गुणांची आवश्यकता भासते. यंदा राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागला असला तरी मराठी विषयात ४.२३ टक्के तर इंग्रजी विषयात ५.४४ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.यंदा भूगोल विषयासाठी सरासरी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सामाजिक शास्त्रे विषयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल १२ टक्क्यांनी वाढला आहे.

टॅग्स :examपरीक्षाResult Dayपरिणाम दिवस