शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

तोंडी परीक्षेमुळे फुगला दहावीचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 05:12 IST

८० : २० पॅटर्न : यंदा केवळ ४.७० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण; ८३ हजार विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शासनाच्या आदेशानुसार दहावीची परीक्षा ८० : २० पॅटर्ननुसार घेण्यात आली. त्यामुळे राज्य मंडळाचा यंदा दहावीचा निकाल विक्रमी लागला आहे. मागील वर्षी २८ हजार ५१६ विद्यार्थ्यांना ९० व त्यापेक्षा अधिक गुण मिळाले होते. मात्र, यंदा ही संख्या ८३ हजारांवर गेली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात तब्बल १८.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून अनेक शाळांकडून तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांना २० पैकी २० गुण दिले जात असल्याची ओरड केली जात होती. त्यामुळे गेल्या वर्षी दहावीचा निकाल केवळ ७७.१० टक्के लागला. त्यामुळे मार्च २०२० परीक्षेसाठी पुन्हा भाषा विषयास तोंडी परीक्षा व सामाजिक शास्त्रे आणि गणित विषयासाठी अंतर्गत मुल्यमापन परीक्षा घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. त्यानुसार घेतलेल्या परीक्षेमुळे यंदा ऐतिहासिक निकाल लागला.सर्व विषयांची १०० गुणांची परीक्षा घेतल्यामुळे मागील वर्षी एकाही विभागाचा निकाल ९० टक्क्यांच्या पुढे गेला नव्हता. परंतु, यंदा परीक्षा पद्धतीत बदल केल्यामुळे सर्व विभागांचा निकाल ९३ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. केवळ औरंगाबाद विभागाचा निकाल ९२ टक्के लागला. तसेच मार्च २०१९मध्ये राज्यातील केवळ २० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले. मात्र, यंदा २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे सवलतीचे गुण दिले जातात. यंदा सवलतीचा लाभ मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ८८ हजार १३१ एवढी आहे.च्मागील वर्षी १०० गुणांच्या लेखी परीक्षेमुळे २२.९० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. मात्र, यंदा केवळ ४.७० टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे तोंडी परीक्षा व अंतर्गत मुल्यमापनामुळे निकाल फुगल्याचे बोलले जात आहे.दहावीत ९० टक्क्यांपेक्षा मिळाले अधिक गुणविभाग २०१९ २०२०पुणे ५,४३५ १५,४६६नागपूर १,३८५ ४,७२३औरंगाबाद ३,५०८ ८,२८२मुंबई ५,३९९ १४,७५कोल्हापूर ४,२०७ १२,६५१अमरावती २,७२५ ८,७१७नाशिक २,५०६ ८,१९२लातूर २,५९१ ८,००४कोकण ७६० २,४७१एकूण २८,५१६ ८३,२६२मराठी, इंग्रजीच्या टक्केवारीत वाढदहावीच्या परीक्षेत मराठी विषयाचा निकाल ९५. ७७ टक्के तर इंग्रजी विषयाचा निकाल ९४.५६ टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत मराठीच्या निकालात १७.३५ टक्क्यांनी तर इंग्रजीच्या निकालात १४.३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तोंडी परीक्षेमुळे भाषा विषयांचा निकाल वाढत असल्याचे दिसून येत आहे.शाळेचा निकाल १०० टक्के लागावा यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांना २० पैकी २० गुण दिले जातात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांची सवलतही दिली जाते. त्यामुळे भाषा विषयात उत्तीर्ण होण्यास विद्यार्थ्यांना खूप कमी गुणांची आवश्यकता भासते. यंदा राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागला असला तरी मराठी विषयात ४.२३ टक्के तर इंग्रजी विषयात ५.४४ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.यंदा भूगोल विषयासाठी सरासरी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सामाजिक शास्त्रे विषयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल १२ टक्क्यांनी वाढला आहे.

टॅग्स :examपरीक्षाResult Dayपरिणाम दिवस