शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

ठाणे, पालघर जिल्ह्यात अमित ठाकरेंच्या महासंपर्क अभियानाला प्रचंड प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 13:56 IST

सकाळी १० वाजता अमित यांनी मीरा भाईंदर येथील बैठक घेतली, तर रात्री ११ वाजता त्यांची पालघर बोईसर येथील बैठक संपली.

ठाणे/ पालघर  - मनसे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाला सध्या जिल्ह्यात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवार सकाळी मीरा भाईंदर, दुपारी वसई विरार आणि रात्री पालघर बोईसर येथे अमित ठाकरे यांनी दौरा केला. प्रत्येक ठिकाणी त्यांना भेटायला दोनशेहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आले होते. अमित ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे ठाणे पालघर जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांना बळ मिळणार असल्याचा विश्वास स्थानिक नेते व्यक्त करत आहे. 

सकाळी १० वाजता अमित यांनी मीरा भाईंदर येथील बैठक घेतली, तर रात्री ११ वाजता त्यांची पालघर बोईसर येथील बैठक संपली. मीरा भाईंदरमध्ये जोरदार प्रतिसाद लाभला. मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १.३० दरम्यान नवघर येथे महाविद्यालयीन विद्यार्थी, मनविसे तसंच पक्ष पदाधिकाऱ्यांशी अमित ठाकरे यांनी संवाद साधला. वसई विरार महापालिकेतील पदाधिकारी तसंच विद्यार्थ्यांना अमित ठाकरे नालासोपारा येथे भेटले. शेकडो विद्यार्थ्यांनी यावेळी मनसेत प्रवेश केला. या विद्यार्थ्यांशी तसंच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी अमित यांनी संवाद साधला.

ठिकठिकाणी झालेले स्वागत, पदाधिकाऱ्यांशी झालेला प्रदीर्घ संवाद आणि नवीन विद्यार्थी तरुणांच्या मुलाखती यांमुळे अमित यांना पालघर बोईसर येथे पोहोचायला रात्रीचे १०.१५ वाजले. त्यापुढे रात्री ११ उलटले, तरी अमित ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. अमित ठाकरे यांच्या १२ तासांहून अधिक चालणाऱ्या बैठक सत्रामुळे मनसे पदाधिकाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. याप्रसंगी पक्षाचे नेते अभिजित पानसे, सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते. 

"मुंबईत ३६ विधानसभा बैठका, सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सर्व तालुकावर बैठका अमित ठाकरे यांनी घेतल्या. मंगळवारपासून त्यांचा ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा सात दिवसीय महासंपर्क दौरा सुरू झाला आहे. मीरा भाईंदर, वसई विरार आणि पालघर बोईसर येथे त्यांना भेटायला संवाद साधायला तरुण विद्यार्थ्यांची अक्षरशः झुंबड उडाली होती. त्यांच्या या दौऱ्यामुळे विद्यार्थी सेना आणि पक्ष दोन्ही बळकट होणार आहेत. - कीर्तिकुमार शिंदे, सरचिटणीस, मनसे 

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसे