शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच

By गणेश वासनिक | Updated: June 11, 2025 10:00 IST

Sanjay Rathore News: मुख्यमंत्र्यांच्या रडारवर असलेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता झाली आहे. अनेक अधिकाऱ्यांचा कालावधी संपला असताना, त्यांना पुन्हा ‘अर्थ’पूर्ण मुदतवाढ देण्यात आली आहे.

- गणेश वासनिकअमरावती - मुख्यमंत्र्यांच्या रडारवर असलेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता झाली आहे. अनेक अधिकाऱ्यांचा कालावधी संपला असताना, त्यांना पुन्हा ‘अर्थ’पूर्ण मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यभरातील सहा विभागांत बदल्यांमध्ये कोट्यवधींचा ‘गेम’ झाला आहे. त्यामुळे मृद व  जलसंधारणमंत्री संजय राठोड यांच्या खात्यात नेमके चालले तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. 

मृद व जलसंधारण खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीने नियुक्त्या ३० मे २०२५ रोजी करण्यात आल्या. मात्र, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या विभागात उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ‘अ’, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपविभागीय जलसंधारण या पदांवर कार्यरत अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना नियमांना फाटा देण्यात आला आहे. विभागनिहाय बदल्यांच्या यादीत कोण अधिकारी कुठे होते आणि कुठे नियुक्ती मिळाली, यातच सर्व काही दडले आहे. या बदली यादीवर मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांचा आशीर्वाद असल्याचे दिसून येते.

विदर्भात मुदतवाढ देण्याचा सपाटामृद व जलसंधारण विभागाने अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या करताना ‘मर्जी’ सांभाळणाऱ्या काही जणांना ‘मागणी’नुसार त्याच जागेवर मुदतवाढ दिली आहे. यात राजेश बहुरिया (चंद्रपूर), जी. टी. काळकर (चंद्रपूर), एच. जी. कानडे (मुखेड) यांचा समावेश असून, विदर्भातच मुदतवाढ देण्याचा प्रकार अधिक दिसून येतो. अश्विनकुमार पवार (यवतमाळ), प्रशांत आवंदकर (चांदूर बाजार), मोहिनी धोंडे (नांदगाव खंडेश्वर) यांना खेटून असलेल्या ठिकाणी बदली मिळाली आहे.

बदल्यांमध्ये सेटिंग, यवतमाळचा ‘पराग’ कोण?मृद व जलसंधारण विभागाच्या ३० मे २०२५ रोजी विविध संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांत यवतमाळ येथील ‘पराग’ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याची माहिती आहे. यादी ‘ओके’ करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. बदली असो वा मुदतवाढ, ‘पराग’च्या माध्यमातूनच करण्याचे फर्मान होते. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या बदलीपात्र अधिकाऱ्यांनी मे महिन्याच्या प्रारंभीच सेटिंग केली होती. 

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAmravatiअमरावती