शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बारावीच्या रसायनशास्त्राच्या पेपरमधील चुकांमुळे विद्यार्थ्यांना 7 गुणांचा बोनस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 09:31 IST

रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतील 4 प्रश्न चुकीचे असल्याचे समजते.

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या रसायनशास्त्र (केमेस्ट्री) विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना 7 गुण आयतेच मिळणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतील 4 प्रश्न चुकीचे असल्याचे समजते. मात्र, तज्ज्ञ शिक्षकांकडून या प्रश्नपत्रिका तयार करूनही अशा चुका राहतातच कशा, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या चुकीमुळे आता नाईलाजाने का होईना सर्व विद्यार्थ्यांना 7 गुण मोफत द्यावे लागणार आहेत. बारावीच्या रसायनशास्त्राच्या पेपरसंदर्भात ही दुसरी मोठी गफलत समोर आली आहे. गेली दोन वर्षे बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आल्यामुळे शिक्षण मंडळाची यापूर्वीच नाचक्की झाली होती. यंदा 28 फेब्रुवारी 2018 रोजी बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर होता. त्यावेळी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर आलेला विद्यार्थी परीक्षेपूर्वी महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात मोबाईलवर व्यस्त होता. महाविद्यालयातील शिक्षकांना त्याचा संशय आल्यामुळे त्यांनी त्याचा मोबाईल तपासला. त्यावेळी मोबाईलवर 2018चा रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका आढळून आली. या प्रकाराने परीक्षांच्या चोख आयोजनाबाबत पाठ थोपटून घेणाऱ्या शिक्षण मंडळाची चांगलीच नाचक्की झाली होती. 

टॅग्स :examपरीक्षाeducationशैक्षणिक