शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या रसायनशास्त्राच्या पेपरमधील चुकांमुळे विद्यार्थ्यांना 7 गुणांचा बोनस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 09:31 IST

रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतील 4 प्रश्न चुकीचे असल्याचे समजते.

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या रसायनशास्त्र (केमेस्ट्री) विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना 7 गुण आयतेच मिळणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतील 4 प्रश्न चुकीचे असल्याचे समजते. मात्र, तज्ज्ञ शिक्षकांकडून या प्रश्नपत्रिका तयार करूनही अशा चुका राहतातच कशा, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या चुकीमुळे आता नाईलाजाने का होईना सर्व विद्यार्थ्यांना 7 गुण मोफत द्यावे लागणार आहेत. बारावीच्या रसायनशास्त्राच्या पेपरसंदर्भात ही दुसरी मोठी गफलत समोर आली आहे. गेली दोन वर्षे बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आल्यामुळे शिक्षण मंडळाची यापूर्वीच नाचक्की झाली होती. यंदा 28 फेब्रुवारी 2018 रोजी बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर होता. त्यावेळी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर आलेला विद्यार्थी परीक्षेपूर्वी महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात मोबाईलवर व्यस्त होता. महाविद्यालयातील शिक्षकांना त्याचा संशय आल्यामुळे त्यांनी त्याचा मोबाईल तपासला. त्यावेळी मोबाईलवर 2018चा रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका आढळून आली. या प्रकाराने परीक्षांच्या चोख आयोजनाबाबत पाठ थोपटून घेणाऱ्या शिक्षण मंडळाची चांगलीच नाचक्की झाली होती. 

टॅग्स :examपरीक्षाeducationशैक्षणिक