शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाचा तिढा २ महिन्यात सरकार कसा सोडवणार?; मंत्री अतुल सावे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 14:44 IST

न्या. गायकवाड यांनी ज्यारितीने समजावलं आणि पुढे काय अडचणी येऊ शकतात, या अडचणी दूर कराव्या लागतील असं जरांगे पाटील यांना सांगितले. त्यामुळे २ महिन्याचा कालावधी जरांगे पाटलांनी दिला.

मुंबई – मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदत मिळाली आहे. २ जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास मुंबईच्या नाड्या बंद करू असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. पण २ महिन्यात सरकार आरक्षणाचा तिढा कसा सोडवणार हा प्रश्न आहे. त्यावर आम्ही २ महिन्यात आरक्षणाबाबत योग्य ती पाऊले उचलू असं आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी दिले आहे.

जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारने मंत्र्यांचे शिष्टमंडळ पाठवले होते. त्यातील मंत्री अतुल सावे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले त्याबद्दल आभारी आहोत. न्या. गायकवाड आणि न्या शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही शिष्टमंडळ घेऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. जर आरक्षण टिकवायचे असेल काही डेटा जमा करावा लागेल आणि त्यासाठी काही वेळ लागेल. तितका वेळ सरकारला दिला पाहिजे असं जरांगे पाटील यांना समजावून सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले, ते हायकोर्टात टिकले परंतु सुप्रीम कोर्टात डेटाअभावी ते टिकले नाही. त्यामुळे जे काही आरक्षण देऊ त्याचा डेटा तयार हवा. त्यासाठी सरकार प्रयत्न करतेय. जरांगे पाटलांना समजून सांगितले. त्यामुळे २ महिन्यात नक्कीच डेटा जमा करून आरक्षणाचा तिढा सोडवू शकतो असा विश्वास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

त्याचसोबत न्या. गायकवाड यांनी ज्यारितीने समजावलं आणि पुढे काय अडचणी येऊ शकतात, या अडचणी दूर कराव्या लागतील असं जरांगे पाटील यांना सांगितले. त्यामुळे २ महिन्याचा कालावधी जरांगे पाटलांनी दिला. सरकार म्हणून आम्ही जास्तीत जास्त मनुष्यबळ लावून आवश्यक डेटा जमा करण्याचा प्रयत्न करू.  जोपर्यंत तांत्रिकबाबी पूर्ण करणार नाही. तोवर आरक्षण दिले तर ते कोर्टात टिकणार नाही. त्यासाठी या गोष्टी करणे गरजेचे आहे. तेच काल जरांगे पाटील यांना सांगितले. वेळ दिला पाहिजे हे त्यांनाही पटले. जास्त यंत्रणा कामाला लावून लवकरात लवकर जो डेटा हवाय तो तयार केला जाईल असं मंत्री सावे यांनी म्हटलं.

दरम्यान, जालनात जी दगडफेक झाली, त्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. त्यातील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एसपींनीही प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु मागील २ दिवसात आक्रमक आंदोलन झाले, त्याचा अहवाल मागवला आहे. त्यातून गंभीर गुन्ह्यांबाबत निर्णय घेऊ. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी सरकारने याआधीही घेतली आणि पुढेही घेतील. गरज भासल्यास त्यांना मुंबईलाही उपचारासाठी आणले जाईल अशी माहितीही मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAtul Saveअतुल सावे