शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

मराठा आरक्षणाचा तिढा २ महिन्यात सरकार कसा सोडवणार?; मंत्री अतुल सावे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 14:44 IST

न्या. गायकवाड यांनी ज्यारितीने समजावलं आणि पुढे काय अडचणी येऊ शकतात, या अडचणी दूर कराव्या लागतील असं जरांगे पाटील यांना सांगितले. त्यामुळे २ महिन्याचा कालावधी जरांगे पाटलांनी दिला.

मुंबई – मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदत मिळाली आहे. २ जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास मुंबईच्या नाड्या बंद करू असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. पण २ महिन्यात सरकार आरक्षणाचा तिढा कसा सोडवणार हा प्रश्न आहे. त्यावर आम्ही २ महिन्यात आरक्षणाबाबत योग्य ती पाऊले उचलू असं आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी दिले आहे.

जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारने मंत्र्यांचे शिष्टमंडळ पाठवले होते. त्यातील मंत्री अतुल सावे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले त्याबद्दल आभारी आहोत. न्या. गायकवाड आणि न्या शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही शिष्टमंडळ घेऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. जर आरक्षण टिकवायचे असेल काही डेटा जमा करावा लागेल आणि त्यासाठी काही वेळ लागेल. तितका वेळ सरकारला दिला पाहिजे असं जरांगे पाटील यांना समजावून सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले, ते हायकोर्टात टिकले परंतु सुप्रीम कोर्टात डेटाअभावी ते टिकले नाही. त्यामुळे जे काही आरक्षण देऊ त्याचा डेटा तयार हवा. त्यासाठी सरकार प्रयत्न करतेय. जरांगे पाटलांना समजून सांगितले. त्यामुळे २ महिन्यात नक्कीच डेटा जमा करून आरक्षणाचा तिढा सोडवू शकतो असा विश्वास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

त्याचसोबत न्या. गायकवाड यांनी ज्यारितीने समजावलं आणि पुढे काय अडचणी येऊ शकतात, या अडचणी दूर कराव्या लागतील असं जरांगे पाटील यांना सांगितले. त्यामुळे २ महिन्याचा कालावधी जरांगे पाटलांनी दिला. सरकार म्हणून आम्ही जास्तीत जास्त मनुष्यबळ लावून आवश्यक डेटा जमा करण्याचा प्रयत्न करू.  जोपर्यंत तांत्रिकबाबी पूर्ण करणार नाही. तोवर आरक्षण दिले तर ते कोर्टात टिकणार नाही. त्यासाठी या गोष्टी करणे गरजेचे आहे. तेच काल जरांगे पाटील यांना सांगितले. वेळ दिला पाहिजे हे त्यांनाही पटले. जास्त यंत्रणा कामाला लावून लवकरात लवकर जो डेटा हवाय तो तयार केला जाईल असं मंत्री सावे यांनी म्हटलं.

दरम्यान, जालनात जी दगडफेक झाली, त्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. त्यातील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एसपींनीही प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु मागील २ दिवसात आक्रमक आंदोलन झाले, त्याचा अहवाल मागवला आहे. त्यातून गंभीर गुन्ह्यांबाबत निर्णय घेऊ. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी सरकारने याआधीही घेतली आणि पुढेही घेतील. गरज भासल्यास त्यांना मुंबईलाही उपचारासाठी आणले जाईल अशी माहितीही मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAtul Saveअतुल सावे