शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

मराठा आरक्षणाचा तिढा २ महिन्यात सरकार कसा सोडवणार?; मंत्री अतुल सावे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 14:44 IST

न्या. गायकवाड यांनी ज्यारितीने समजावलं आणि पुढे काय अडचणी येऊ शकतात, या अडचणी दूर कराव्या लागतील असं जरांगे पाटील यांना सांगितले. त्यामुळे २ महिन्याचा कालावधी जरांगे पाटलांनी दिला.

मुंबई – मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदत मिळाली आहे. २ जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास मुंबईच्या नाड्या बंद करू असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. पण २ महिन्यात सरकार आरक्षणाचा तिढा कसा सोडवणार हा प्रश्न आहे. त्यावर आम्ही २ महिन्यात आरक्षणाबाबत योग्य ती पाऊले उचलू असं आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी दिले आहे.

जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारने मंत्र्यांचे शिष्टमंडळ पाठवले होते. त्यातील मंत्री अतुल सावे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले त्याबद्दल आभारी आहोत. न्या. गायकवाड आणि न्या शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही शिष्टमंडळ घेऊन जरांगे पाटलांची भेट घेतली. जर आरक्षण टिकवायचे असेल काही डेटा जमा करावा लागेल आणि त्यासाठी काही वेळ लागेल. तितका वेळ सरकारला दिला पाहिजे असं जरांगे पाटील यांना समजावून सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले, ते हायकोर्टात टिकले परंतु सुप्रीम कोर्टात डेटाअभावी ते टिकले नाही. त्यामुळे जे काही आरक्षण देऊ त्याचा डेटा तयार हवा. त्यासाठी सरकार प्रयत्न करतेय. जरांगे पाटलांना समजून सांगितले. त्यामुळे २ महिन्यात नक्कीच डेटा जमा करून आरक्षणाचा तिढा सोडवू शकतो असा विश्वास मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

त्याचसोबत न्या. गायकवाड यांनी ज्यारितीने समजावलं आणि पुढे काय अडचणी येऊ शकतात, या अडचणी दूर कराव्या लागतील असं जरांगे पाटील यांना सांगितले. त्यामुळे २ महिन्याचा कालावधी जरांगे पाटलांनी दिला. सरकार म्हणून आम्ही जास्तीत जास्त मनुष्यबळ लावून आवश्यक डेटा जमा करण्याचा प्रयत्न करू.  जोपर्यंत तांत्रिकबाबी पूर्ण करणार नाही. तोवर आरक्षण दिले तर ते कोर्टात टिकणार नाही. त्यासाठी या गोष्टी करणे गरजेचे आहे. तेच काल जरांगे पाटील यांना सांगितले. वेळ दिला पाहिजे हे त्यांनाही पटले. जास्त यंत्रणा कामाला लावून लवकरात लवकर जो डेटा हवाय तो तयार केला जाईल असं मंत्री सावे यांनी म्हटलं.

दरम्यान, जालनात जी दगडफेक झाली, त्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. त्यातील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एसपींनीही प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु मागील २ दिवसात आक्रमक आंदोलन झाले, त्याचा अहवाल मागवला आहे. त्यातून गंभीर गुन्ह्यांबाबत निर्णय घेऊ. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी सरकारने याआधीही घेतली आणि पुढेही घेतील. गरज भासल्यास त्यांना मुंबईलाही उपचारासाठी आणले जाईल अशी माहितीही मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAtul Saveअतुल सावे