शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

घरच्यांना कसे तोंड दाखवू?

By admin | Updated: March 1, 2017 03:41 IST

सैन्य भरतीसाठी वारंवार प्रयत्न करूनही अपयश पाठ सोडत नव्हते.

पंकज रोडेकर,ठाणे- सैन्य भरतीसाठी वारंवार प्रयत्न करूनही अपयश पाठ सोडत नव्हते. कुणी सात ते आठ तर कुणी तीन-चार वेळा प्रयत्न केले होते... नशीब कधी फळफळेल, याची शाश्वती नव्हती. त्यामुळेच वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या काही माजी सैनिकांची मुले सैन्य भरती घोटाळ्यात फसली... हे पाऊल उचलण्यापूर्वी एकदा जरी पालकांना विचारले असते, तर ही वेळ आली नसती, अशी भावनाही काही विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ कडे मांडली. ती मांडताना त्यांना अश्रु अनावर झाले होते.सैन्य भरती मंडळातर्फे (आर्मी रिक्रुटमेंट बोर्ड) २६ फेब्रुवारीला लिपिक आणि ट्रेड्समनसह चार पदांसाठी देशभरात घेतलेल्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पर्दाफाश केला. या घोटाळ्यात महाराष्ट्र- गोव्यातील ३५० विद्यार्थी फसले आहेत. यात गोव्यातील ४५, तर महाराष्ट्रातील ३०५ विद्यार्थी आहेत. सर्वाधिक विद्यार्थी नागपूर केंद्राचे आहेत. या विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडे अडकून पडली आहेत. ती मिळावी आणि पोलीस कारवाईचा अंदाज घ्यावा, यासाठी गुन्हे शाखेबाहेर पालक आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. त्यातील काही विद्यार्थ्यांनी ही भावना व्यक्त केली.दिल्लीतील एका तरुणाने सैन्य भरतीसाठी १८ व्या वर्षापासून प्रयत्न सुरु केले. माजी सैनिकाचा मुलगा असल्याने त्याला सैन्यात दाखल होण्याच्या नफा-नोट्यांची पूर्ण माहिती होती. त्यामुळे त्याने पूर्ण जोर लावला. मात्र, प्रयत्न करून हाती यश येत नव्हते. आताची त्याची नववी वेळ होती. ‘यंदा नव्या जोमाने जोरदार तयारी करून पुण्यात आलो होतो. लेखी परीक्षेच्या आदल्या दिवशी सैन्य दलाच्या कॅम्पमध्ये सिव्हिल युनिफॉर्ममधील दोघांनी माझ्याशी ओळख वाढवून पेपरबाबत विचारणा केली. कॅम्पबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी एकापाठोपाठ विचारणा केली. तसेच गाडीतून एका हॉलमध्ये नेले. तेथे त्यांनी जवळपास २८ प्रश्न दिले आणि अडीच लाखांची मागणी केली. हे पैसे निकालानंतर द्यायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. असाच प्रकार इतरही काही जणांनी झाला,’ असे त्यांनी स्पष्ट केले. सैन्यात भरती होण्याचे खुळ असल्याने त्यांनी पालकांशी चर्चा केली नाही अथवा घरातील मोठ्या व्यक्तींशी न बोलता केलेले धाडस अंगलट आले आहे. पुढे काय वाढून ठेवले आहे, याची भीती त्यांच्या डोळ्यापुढे आहे. आता कसे तोंड दाखवायचे. त्यांना काय सांगायचे, ही भीतीही त्यांना सतावते आहे. (प्रतिनिधी)