शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

सद्यपरिस्थितीत निवडणुका झाल्या तर मविआला किती जागा मिळतील? जयंत पाटील म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 21:29 IST

सध्या राज्यातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत.

सध्या राज्यातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु त्यानंतर पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी तो मागे घ्यावा अशी विनंती केली होती. त्यानंतर शुक्रवारी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. दरम्यान, निवडणुका हा देखील सद्यस्थितीतील राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एका मुलाखतीदरम्यान आपलं मत व्यक्त केलं.

राज्यात सद्यस्थितीत निवडणुका झाल्या तर किती जागा येतील याचं गणित मांडलंय का? असा प्रश्न विचारण्यात आला. “महाविकास आघाडी एकत्र राहिली तर १७० ते १८० जागा यायला काहीच अडचण नाही. शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी मिळून ९० ते १०० च्या आत राहतील असं वाटतंय,” असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं. झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. “नुकत्याच बाजार समितीच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात बहुसंख्य ठिकाणी मविआ एकत्र लढली तिकडे मोठा विजय झाला आहे. तिन्ही पक्ष एकत्र आल्यावर विधानसभेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकतील. बहुसंख्य ग्रामपंचायतीदेखील महाविकास आघाडीकडेच आहेत. एकजूट ही महाराष्ट्रात मोठी ताकद होतेय किंवा झालेली आहे हे आकडेवारीवरून दिसतंय,” असंही ते म्हणाले.

“काही ठिकाणी तिघांची आघाडी होते काही ठिकाणी होत नाही हा भाग निराळा आहे. पण मतं एकत्र केली तर कार्यकर्त्यांना एकत्र आलो असतो तर बरं झालं असतं असं वाटतं. दुसऱ्या कोणत्याही पक्षाला या समीकरणाशी मुकाबला करणं फार कठीण आहे,” असं पाटील यांनी नमूद केलं.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक