शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

सद्यपरिस्थितीत निवडणुका झाल्या तर मविआला किती जागा मिळतील? जयंत पाटील म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 21:29 IST

सध्या राज्यातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत.

सध्या राज्यातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु त्यानंतर पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी तो मागे घ्यावा अशी विनंती केली होती. त्यानंतर शुक्रवारी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. दरम्यान, निवडणुका हा देखील सद्यस्थितीतील राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एका मुलाखतीदरम्यान आपलं मत व्यक्त केलं.

राज्यात सद्यस्थितीत निवडणुका झाल्या तर किती जागा येतील याचं गणित मांडलंय का? असा प्रश्न विचारण्यात आला. “महाविकास आघाडी एकत्र राहिली तर १७० ते १८० जागा यायला काहीच अडचण नाही. शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी मिळून ९० ते १०० च्या आत राहतील असं वाटतंय,” असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं. झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. “नुकत्याच बाजार समितीच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात बहुसंख्य ठिकाणी मविआ एकत्र लढली तिकडे मोठा विजय झाला आहे. तिन्ही पक्ष एकत्र आल्यावर विधानसभेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकतील. बहुसंख्य ग्रामपंचायतीदेखील महाविकास आघाडीकडेच आहेत. एकजूट ही महाराष्ट्रात मोठी ताकद होतेय किंवा झालेली आहे हे आकडेवारीवरून दिसतंय,” असंही ते म्हणाले.

“काही ठिकाणी तिघांची आघाडी होते काही ठिकाणी होत नाही हा भाग निराळा आहे. पण मतं एकत्र केली तर कार्यकर्त्यांना एकत्र आलो असतो तर बरं झालं असतं असं वाटतं. दुसऱ्या कोणत्याही पक्षाला या समीकरणाशी मुकाबला करणं फार कठीण आहे,” असं पाटील यांनी नमूद केलं.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक