शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

सद्यपरिस्थितीत निवडणुका झाल्या तर मविआला किती जागा मिळतील? जयंत पाटील म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 21:29 IST

सध्या राज्यातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत.

सध्या राज्यातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु त्यानंतर पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी तो मागे घ्यावा अशी विनंती केली होती. त्यानंतर शुक्रवारी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. दरम्यान, निवडणुका हा देखील सद्यस्थितीतील राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी एका मुलाखतीदरम्यान आपलं मत व्यक्त केलं.

राज्यात सद्यस्थितीत निवडणुका झाल्या तर किती जागा येतील याचं गणित मांडलंय का? असा प्रश्न विचारण्यात आला. “महाविकास आघाडी एकत्र राहिली तर १७० ते १८० जागा यायला काहीच अडचण नाही. शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी मिळून ९० ते १०० च्या आत राहतील असं वाटतंय,” असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं. झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. “नुकत्याच बाजार समितीच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात बहुसंख्य ठिकाणी मविआ एकत्र लढली तिकडे मोठा विजय झाला आहे. तिन्ही पक्ष एकत्र आल्यावर विधानसभेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकतील. बहुसंख्य ग्रामपंचायतीदेखील महाविकास आघाडीकडेच आहेत. एकजूट ही महाराष्ट्रात मोठी ताकद होतेय किंवा झालेली आहे हे आकडेवारीवरून दिसतंय,” असंही ते म्हणाले.

“काही ठिकाणी तिघांची आघाडी होते काही ठिकाणी होत नाही हा भाग निराळा आहे. पण मतं एकत्र केली तर कार्यकर्त्यांना एकत्र आलो असतो तर बरं झालं असतं असं वाटतं. दुसऱ्या कोणत्याही पक्षाला या समीकरणाशी मुकाबला करणं फार कठीण आहे,” असं पाटील यांनी नमूद केलं.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक