शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काँग्रेस-राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:22 IST

महायुतीला कौल : जनमत चाचण्यांनी वाढविली उत्सुकता

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर जनमत चाचण्यांनी महाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेना महायुतीच्या बाजुने कौल दिला आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला किती जागा मिळणार याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केल्यामुळे राजकीय नेत्यांसह विश्लेषकही संभ्रमात आहेत.

२०१४च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला ४८ पैकी ४२ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस आघाडीला ६ जागा मिळाल्या होत्या. यावेळी महायुतीच्या जागांमध्ये घट होण्याची शक्यता बहुतेक एक्झिट पोलने वर्तविली आहे. तर न्यूज १८- आयडीएसओएसच्या अंदाजानुसार काँग्रेसला केवळ एक जागा मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार भाजप-शिवसेना युतीला ३७ तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ११ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसने प्रत्येकी २२ जागा लढविल्या. राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून हातकणंगले आणि अमरावती तर काँग्रेसने सांगली आणि पालघर या जागा आघाडीतील घटक पक्षांना दिल्या. सांगली आणि हातकणंगले या दोन जागांवर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार उभे होते. अमरावतीची जागा नवनीत राणा यांनी लढविली तर पालघरची जागा बहुजन विकास आघाडीने लढविली. मागच्या निवडणुकीत राजू शेट्टी हे हातकणंगले येथून विजयी झाले होते. यावेळीची त्यांच्या विजयाची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, सांगलीत काय होणार, याबाबत उत्सुकता आहे. येथून स्व.वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील स्वाभिमानीकडून उभे होते.

अशोक चव्हाण (नांदेड), सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), माणिकराव ठाकरे (यवतमाळ), मिलिंद देवरा (दक्षिण मुंबई) आणि प्रिया दत्त (उत्तर मध्य) या जागा तर हमखास निवडून येतील असा दावा काँग्रेस नेते करत आहेत.एक्झिट पोलचा अंदाज आम्हाला मान्य नाही. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला किमान २४ ते २५ जागा मिळतील.-अशोक चव्हाण,प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसजनमत चाचण्यांचा अंदाज म्हणजे अंतिम निकाल नाही. २३ मे रोजी निकालानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल, मात्र भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील आणि पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येईल.-नितीन गडकरी, केंद्रीय मंत्रीअंदाज अपना-अपनाएबीपी-नेल्सन : भाजप १७, शिवसेना १७, काँग्रेस ४, राष्ट्रवादी ९ आणि इतरांना १ जागा मिळतीलटीव्ही-९ सीव्होटर्स : भाजप १९, शिवसेना १५,काँग्रेस ८, राष्ट्रवादी ६ जागा मिळतीलन्यूज १८- आयडीएसओएस : भाजप २१ ते २३, शिवसेना २० ते २२, काँग्रेस १, राष्ट्रवादीला ४-६ व इतरांना ३-५ जागांची शक्यता
इंडिया टुडे अ‍ॅक्सिस माय इंडिया : शिवसेना-भाजपला ३८-४२ तर काँग्रेस-राष्ट्रवादीला ६-१० जागा मिळतीलरिपब्लिक जन की बात : युतीला ३४ ते ३९ तर आघाडीला ८ ते १२ जागा मिळण्याचा अंदाज आहेन्यूज २४-टुडे्ज चाणक्य : शिवसेना-भाजपला ३८ आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला १० जागा मिळतीलरिपब्लिक सी व्होटर्स : शिवसेना-भाजपला ३४ तर काँग्रेस-राष्ट्रवादीला १४ जागा मिळतीलएनडीटीव्हीचा पोल आॅफ पोल्स : महायुतीला ३५ तर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला १२ आणि इतरांना १ जागा मिळेल

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस