शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
6
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
7
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
8
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
9
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
10
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
11
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
12
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
13
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
14
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
15
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
16
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
17
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
18
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
19
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
20
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  

अजून किती काळ चालणार लसणाची महागाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 09:43 IST

किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ४०० ते ६०० रुपयांवर गेले आहेत. देशभर कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार झाला की हंगामा सुरू होतो.

- नामदेव मोरेउपमुख्य उपसंपादकदेशात २०२२ पर्यंत प्रत्येक हंगामात बाजारभाव कोसळल्यामुळे लसूण उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत होते. यामुळे तोट्याच्या शेतीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली व देशभर लसूणची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. २०२२ मध्ये होलसेल मार्केटमध्ये ८ ते ३० रुपये किलो दराने विकला जाणारा  लसूण आता २४० ते ३५० रुपयांवर पोहोचला आहे. 

किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ४०० ते ६०० रुपयांवर गेले आहेत. देशभर कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार झाला की हंगामा सुरू होतो. दर वाढले की ग्राहकांची ओरड सुरू होते. दर घसरले की शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. वर्षातून दोन वेळा या विषयावर जोरदार चर्चा होतेच. पण मागील दोन वर्षामध्ये लसणाचे दर सातत्याने वाढत असूनही त्यावर फारशी चर्चा होताना दिसत नाही. प्रत्येक घरातील रोजच्या भाजीला लसणाची फोडणी लागतेच. पण ही फोडणी आता आवाक्याबाहेर जाऊ लागली आहे. 

संपूर्ण देशात तब्बल दीड ते दोन वर्ष लसूण टंचाई सुरू आहे. तरीही वातावरणात या संदर्भात रोष भरून राहिलेला नाही. भारत लसूण उत्पादनामध्ये चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात एकूण उत्पादनाच्या जवळपास ८० टक्के उत्पादन मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये होते. 

यानंतर उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये जवळपास १० टक्के उत्पादन होते. लसूण उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा नंबर दहावा असून एकूण उत्पादनामध्ये हा वाटा फक्त १ टक्केच आहे. 

वर्षानुवर्ष देशात लसणाला भाव मिळत नाही. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये नवीन पीक बाजारात आले की ७ ते ३० रुपये किलो दराने विक्री होते. काही ठिकाणी प्रतिकिलो ५ रुपये किलो दराने विक्री होती होती. यामुळे दोन वर्षांपासून देशभर लसूण उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून पर्यायी पिकांवर लक्ष दिले आहे.उत्पादन घटल्यामुळे तीव्र टंचाई होऊन बाजारभाव प्रचंड वाढू लागले आहेत. मागणी व पुरवठा यांचा  मेळ जुळत नाही. दोन वर्षात लसूणचे दर तब्बल ३० पट जास्त झाले आहेत. एवढी दरवाढ इतर कोणत्याही कृषी मालाची झालेली नाही. यावर्षी लागवड  चांगली झाली असून जानेवारीअखेरीस आवक वाढली तरच दर नियंत्रणात येऊ शकतात.

साठेबाजीचीही चौकशी व्हावीकांदा, डाळी व इतर वस्तूंचे दर वाढले की त्याविषयी जोरदार आवाज उठविला जातो. शासन साठेबाजी रोखण्यासाठीही उपाययोजना करते. परंतु लसूण दरवाढ सुरू झाल्यापासून साठेबाजी होती की नाही याची चौकशी अद्याप झालेली नाही. काही व्यापारी साठेबाजी करत असल्याची चर्चाही ऐकायला मिळत असून शासनाने याविषयी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

लसूण उत्पादक राज्येमहाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, आसाम, ओरिसा, हरयाणा, पश्चिम बंगाल.

चायना लसूणवरून वादलसूण टंचाई दूर करण्यासाठी आयात सुरू झाली आहे. अफगाणिस्तानमधून मुंबईमध्येही लसूणची आवक सुरू आहे. परंतु देशात अफगाणिस्तान व इतर देशांच्या नावाखाली चीनचा बंदी असलेला लसूण आयात केला जात असल्याचा आरोप होत आहे.