शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासघातकी पवारांच्या पालख्या किती काळ उचलणार : मुख्यमंत्र्यांचा हर्षवर्धन पाटील यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 12:41 IST

शरद पवार यांनी १९९१ पासून विश्वासघाताचे राजकारण केले. स्व: शंकरराव पाटील यांनाही लोकसभेला कामाला लागा असे सांगून अचानक पुतण्याला उमेदवारी होती.

ठळक मुद्दे निर्णय तुम्ही घ्यायचा आहे 

कळस : शरद पवार यांनी १९९१ पासून विश्वासघाताचे राजकारण केले. स्व: शंकरराव पाटील यांनाही लोकसभेला कामाला लागा असे सांगून अचानक पुतण्याला उमेदवारी होती. त्यामुळे  तुम्ही कितीही काम करा.  तुम्हाला ही मंडळी चित केल्याशिवाय राहणार नाही. किती पालख्या उचलायच्या ते तुम्ही ठरवा. तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. मात्र मित्र होता म्हणून सांगतो तुमचा वाली कोण आहे ते तुम्ही ठरवा असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना केला. इंदापूर येथे महायुतीच्या उमेदवार  कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सांगता सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, . पक्षाच्या प्रमुखाला हवेची दिशा समजली त्यामुळे माढा मतदारसंघातून पळ काढावा लागला. त्यामुळे यांचे तर काय होईल? पंतप्रधान मोदीनी बेटी बचाओ असा नारा दिला. मात्र याचे अनुकरण पवार बेटी बचाओ असे सांगून करत आहेत . घरात घुसून मारण्याची भाषा यांच्याकडून केली जात आहे ही अनुकरणीय नाही. ते म्हणाले, मुळशी धरणाचा पाण्याचा प्रश्न सोडवुन या भागातील बावीस गावाना पाणी दिले जाईल. डबघाईला आलेल्या कारखान्यांना मदत केली. मात्र भीमा पाटस साखर कारखान्याला केवळ राजकीय हेतूने पुणे जिल्हा बँकेने मदत केली नाही. त्यामुळे राज्यशासन कारखान्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे.  केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले  म्हणाले,  याठिकाणी आम्ही घुसुन मारु असे सांगतात मात्र आम्ही घुसुन तर दिले पाहिजे.  पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर म्हणाले,  मागील निवडणुकीचा वचपा काढा. धनगर समाजाचे नुकसान  पवारांनी केले.  मात्र धनगर समाजाला सवलती देण्याचे काम या सरकारने केले.जलसंधारण मंत्री राम शिंदे म्हणाले, सत्तेतून पैसा व पैसातुन सत्ता धोरण विरोधकांनी राबीवले अनेकांची घर फोडण्याचे काम यांनी केले. यांना चारी मुंडी चित केले जाईल.  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या,  राष्ट्रवादी काँग्रेसकडुन जातीपातीचे राजकारण केले जात आहे. सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम केले. मात्र आता हे चालणार नाही. कांचन कुल म्हणाल्या, याठिकाणी विरोधकांची हुकुमशाही चालु आहे. आत्ता फोन करायला सुरूवात झाली आहे. या वेळी  दौंडचे आमदार राहुल कुल, उत्तम जानकर, मिथुन आटोळे यांची भाषणे झाली  पृथ्वीराज जाचक, सुनिल पोटे, राजेंद्र काळे, मारुती वणवे, भजनदास पवार, माऊली चवरे, दादासाहेब केसकर, नानासाहेब शेंडे, उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण