शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

वर्षाला ८४ हजारांत जगणार कसे?; तुटपुंज्या पगारावरच गुजराण, धुण्या-भांड्याचे काम द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 07:57 IST

सी.एच.बी. प्राध्यापकांची क्रूर चेष्टाच, या आर्थिक शोषणाविषयी सरकार गप्प आहे. वेळेत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही

डाॅ. प्रकाश मुंज

कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे कारण पुढे करीत गेली तब्बल १० वर्षे भरती प्रक्रियाच थांबविली आहे. परिणामी, प्रत्येक वर्षी सेट-नेट उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मोठी भर पडत आहे. या उच्चविद्याविभूषितांना वेठबिगाराची नोकरी करावी लागत आहे. 

केंद्र व राज्य शासनाने आर्थिक कारण पुढे करून तासिका तत्त्वावर (सीएचबी) धोरण सुरू केले आहे. त्यातून उच्चशिक्षित मनुष्यबळ अतिशय कमी पैशांत मिळते. आर्थिक चणचण आणि लग्नाचं वय म्हणून ते हे काम करीत आहेत. सरकारी धोरण असेच सुरू राहिले, तर त्याला कायमस्वरूपी सीएचबी  प्राध्यापक म्हणूनच निवृत्त व्हावे लागेल. घरखर्च भागविण्यासाठी अनेक सीएचबीधारक वेटर, कुक, मॅनेजर तसेच रस्त्यांवर पुस्तके विकणे, गॅस सिलिंडरचे  वितरण करणे, अशी कामे करतात. पश्चिम महाराष्ट्रातील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये  १५ वर्षे सीएचबी म्हणून सेवा बजावलेले इतिहास विषयाचे प्रा. डॉ. दिलीप जाधव  यांचे फेब्रुवारीमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. ते आयुष्यभर तुटपुंज्या पगारावरच होते.

या आर्थिक शोषणाविषयी सरकार गप्प आहे. वेळेत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. तासिका होत नसल्याने महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण घटत आहे.  याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. २४ मार्च २०१८ च्या शासन आदेशनुसार एका रिक्त जागेसाठी दोन सहायक प्राध्यापकांची तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावर फक्त ९ महिन्यांसाठी नियुक्ती करणे अनिवार्य केले आहे.  यासाठी घड्याळी ४५ मिनिटांच्या एका तासाला ४१७ रुपये दिले जातात. प्रत्येक आठवड्याला ७ तासांचा कार्यभार असतो. याव्यतिरिक्त अध्यापनाचे मानधन दिले जात नाही. शैक्षणिक वर्षातील हे वेतन एकूण ८४ हजार रुपये होते.

धुण्या-भांड्याचे काम द्या; सरकारकडे मागणीगेल्या आठवड्यात काही सीएचबी संघटनांनी सरकारला निवेदन देऊन त्यांच्या घरी धुणी-भांडी करण्याचे काम देण्याची मागणी केली. अशी मागणी करावी लागणे दुर्दैवी आहे. 

कार्यरत शिक्षक: १४,१६,२९९ (सहायक, सहयोगी, प्राध्यापक) रिक्त पदे : सुमारे दीड लाख (तासिका तत्त्वावर कार्यरत जवळजवळ तीन लाख)दहा वर्षांत नेट परीक्षा उत्तीर्ण : ७,१६,५६५, पीएच.डी. धारक : महाराष्ट्रात ६२,२०४विद्यार्थिसंख्या : ३.७३ कोटी

प्रमुख मागण्या

  • महाविद्यालय व विद्यापीठात १००% प्राध्यापक भरती करावी. 
  • तासिका तत्त्व (सीएचबी) धोरण पूर्णत: बंद करावे. 
  • कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट झाल्यानंतर सीएचबी अनुभव ग्राह्य धरण्यात यावा.
  • जादा कार्यभारासाठी ‘अर्धवेळ कायमस्वरूपी प्राध्यापक’  पदाची निर्मिती करावी. 
  • विनाअनुदानित महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान द्यावे.
टॅग्स :Teacherशिक्षक