शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

...ते पत्र नक्की व्हायरल कसं झालं?; अभिनेता किरण माने प्रकरणात भलताच दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 18:29 IST

ग्रामपंचायतीला चित्रीकरणाच्या निमित्ताने गावाला आर्थिक मदत होत असताना अचानकपणे हे पत्र पाठवले जाते म्हणजे याच्या पाठीमागे नेमके काय कारण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत

अभिनव पवार

सातारा - 'मुलगी झाली हो' च्या चित्रीकरणावरून गुळुंब ग्रामपंचायतीने पाठवलेले पत्र नक्की कोणाच्या आदेशाने पाठवले याबाबत ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य देखील अनभिज्ञ आहेत. वास्तविक गुळुंब गावच्या ग्रामपंचायतीने सरपंच यांचे स्वाक्षरीने काढलेले सदर पत्र पाठवले असले तरी याबाबत बहुतांश ग्रामपंचायत सदस्यांना याबाबत कसलीही माहिती नव्हती. सदर पत्र हे ग्रामपंचायतीच्या कोणत्याही ठरावाशिवाय अगर प्रस्तावाशिवाय पाठवण्यात आल्याने याबाबतचे गौडबंगाल नक्की काय आहे याची शहानिशा होत नाही.

याबाबत गुळुंब येथील सरपंच स्वाती माने यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही. तसेच ग्रामपंचायतीला चित्रीकरणाच्या निमित्ताने गावाला आर्थिक मदत होत असताना अचानकपणे हे पत्र पाठवले जाते म्हणजे याच्या पाठीमागे नेमके काय कारण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. गुळुंब ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या मयुरेश्वर येथे या मालिकेचा सेट उभारण्यात आला असून येथील स्थानिकांना देखील यानिमित्ताने रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र एका पत्रामुळे येथे खळबळ उडाली आहे. हे पत्र नेमके कोणी बनवले व कोणी व्हायरल केले, याबाबतची माहिती अजूनही उघड झाली नाही.

मालिकेच्या सेटवरून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता किरण माने यांना मालिकेतून बाहेर काढण्याचे कारण हे राजकीय नसून त्यांचा स्वभाव आहे. मात्र याबाबत संपूर्ण राज्यात मतभेद आहेत. मुळातच या मालिकेच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी आधीच ग्रामपंचायतीची रितसर परवानगी घेतली होती. परंतु अचानकपणे ही परवानगी नाकारण्याचे पत्र नेमके कोणी व कशासाठी दिले याबाबत अनेक शंका निर्माण होत आहेत.

‘त्या’ पत्रात काय होतं?

अभिनेता किरण माने प्रकरणात गुळुंब ग्रामपंचायतीने नोटीस बजावून पॅनोरमा एंटरटेनमेंट प्रा. लि. या संस्थेला १५ जानेवारी २०२२ पासून गुळुंब ग्रामपंचायतीच्या हद्दीत मालिकेचे चित्रीकरण करण्यास दिलेली परवानगी रद्द करून चित्रीकरण थांबवण्यास सूचना केली. राजकीय भूमिका मांडणाऱ्या एका मराठी कलावंताला घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर केला म्हणून मालिकेतून काढून टाकणं हे घटनेविरोधी आहे,’ असे मत गुळुंब ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती माने यांनी व्यक्त केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या संपूर्ण टीमने महाराष्ट्रात शिवशंभू, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी लोकशाही नांदते, हे विसरू नये, असा सल्लादेखील या पत्राद्वारे देण्यात आला. तसेच, मनुवादी विचारसरणीच्या वाहिनी व ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या गुळुंब गावात होत असलेल्या चित्रीकरणासाठी गुळुंब ग्रामपंचायत मान्यता नाकारत असून अशा प्रवृत्तीला इथून पुढे आमच्या गुळुंब गावच्या हद्दीत प्रवेश नाही, अशीही स्पष्टोक्ती सरपंच स्वाती माने यांनी केली होती.

टॅग्स :kiran maneकिरण माने