शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

मीच माझे नाव पाकिटावर कसे लिहिणार? राऊतांच्या घरी सापडलेल्या रकमेवर एकनाथ शिंदेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 06:14 IST

शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न; मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही; पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच सर्व पंचनामे होतील.  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मिळणारी मदत कमी असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारच्या मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. दरड प्रवण गावातील तात्पुरते स्थलांतर केलेल्या नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा देण्यात याव्यात. प्राणहानी व घरांच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आवश्यक निधीची मागणी करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

 केवळ दोन मंत्र्यांचे सरकार सध्या राज्याचा कारभार हाकत आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे, याकडे लक्ष वेधले असता सरकार चांगले चालले आहे की नाही, असा थेट सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. आम्ही शेतकऱ्यांना केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत देण्याची योजना थांबली होती. आम्ही ती योजना पुन्हा कार्यान्वित केली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले. दुष्काळी भागात पाणी वळवण्याचे धोरण स्वीकारले. छोट्या सिंचन योजनांच्या वीजबिलात प्रतियुनिट एक रुपया आकारणी कमी केली. आम्ही खूप काम करतोय आणि लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

ईडीने संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकला त्यावेळी जप्त केलेल्या पाकिटावर तुमचे नाव होते, याबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी हे पैसे कुणाच्या घरात सापडले? माझ्या घरी सापडले का? त्यावर कोण लिहू शकतो? मी लिहिणार का? असे प्रतिप्रश्न करत तुम्ही याबाबत त्यांनाच विचारा, असा खुलासा केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊतFarmerशेतकरी