शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मीच माझे नाव पाकिटावर कसे लिहिणार? राऊतांच्या घरी सापडलेल्या रकमेवर एकनाथ शिंदेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 06:14 IST

शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न; मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही; पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच सर्व पंचनामे होतील.  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मिळणारी मदत कमी असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारच्या मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. दरड प्रवण गावातील तात्पुरते स्थलांतर केलेल्या नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा देण्यात याव्यात. प्राणहानी व घरांच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आवश्यक निधीची मागणी करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

 केवळ दोन मंत्र्यांचे सरकार सध्या राज्याचा कारभार हाकत आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे, याकडे लक्ष वेधले असता सरकार चांगले चालले आहे की नाही, असा थेट सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. आम्ही शेतकऱ्यांना केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत देण्याची योजना थांबली होती. आम्ही ती योजना पुन्हा कार्यान्वित केली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले. दुष्काळी भागात पाणी वळवण्याचे धोरण स्वीकारले. छोट्या सिंचन योजनांच्या वीजबिलात प्रतियुनिट एक रुपया आकारणी कमी केली. आम्ही खूप काम करतोय आणि लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

ईडीने संजय राऊत यांच्या घरावर छापा टाकला त्यावेळी जप्त केलेल्या पाकिटावर तुमचे नाव होते, याबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी हे पैसे कुणाच्या घरात सापडले? माझ्या घरी सापडले का? त्यावर कोण लिहू शकतो? मी लिहिणार का? असे प्रतिप्रश्न करत तुम्ही याबाबत त्यांनाच विचारा, असा खुलासा केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊतFarmerशेतकरी