शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

भेसळीवर नियंत्रण येणार तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 06:12 IST

अन्न व औषध प्रशासन : विभागात ३५ टक्के जागा रिक्त

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : राज्यातील ११ कोटींहून अधिक जनतेची औषध व अन्न सुरक्षा फक्त ८२५ अधिकाऱ्यांकडे आहे. त्यात आयुक्तांपासून शिपायापर्यंतच्या कर्मचाºयांचा समावेश आहे. एकीकडे दूध, खाद्यपदार्थ, औषधांमध्ये भेसळ करणाºयांना आजन्म कारावासाची व या गुन्ह्यात जामीन न देणारा कायदा विधानसभेने मंजूर केला असला तरी या कायद्याची अंमलबजावणी करणे व भेसळ रोखण्यासाठी पुरेसे मनुष्यबळच विभागाकडे नाही.

गट अ ते गट ड या चार प्रवर्गात मंजूर असणाºया ११७६ पदांपैकी तब्बल ४०७ जागा रिक्त आहेत. हे प्रमाण ३४.६० टक्के एवढे प्रचंड आहे. औषध निरीक्षकांची फक्त १६१ पदे मंजूर आहेत, त्यातील ६२ पदे रिक्त आहेत. याचा अर्थ राज्यातील ७५ हजार औषधांची दुकाने तपासण्यासाठी फक्त ९९ अधिकारी आहेत. तर खाद्यपदार्थ विकणाºया तब्बल १७ लाख दुकानांच्या तपासणीसाठी या विभागाकडे फक्त २०९ अधिकारी आहेत.

ही यंत्रणा मजबूत केली पाहिजे म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाने पूर्णपणे नवीन आकृतीबंध तयार केला पण तो तीन वर्षापासून मंजूरीसाठी या विभागातून त्या विभागात खेट्या घालत आहे. परिणामी राज्यात होणारी भेसळ रोखणारी कोणतीही यंत्रणा आजमितीला उभीच राहू शकलेली नाही. खाण्याच्या तेलात पामतेल मिसळले जाते ते पण तपासण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही. त्याशिवाय जागतिक दर्जाची एकही प्रयोगशाळा राज्यात नाही. विषारी औषधांच्या परिणामांचा तपास करणारी, वाया जाणाºया धान्य व फळांवर प्रक्रिया करणारी अशी कोणतीही यंत्रणा राज्यात उपलब्ध नाही.

महाराष्टÑातून जवळपास ५० हजार कोटी रुपयांच्या आसपास औषधांची निर्यात होते पण औषध उत्पादकांना येणाºया अडचणी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीची साधी सिंगल विंडो यंत्रणाही अन्न व औषध प्रशासन विभाग उभी करू शकलेला नाही.

दूध आणि खाद्यपदार्थ, औषधांमध्ये भेसळ करणाºयांना आजन्म कारावासाची शिक्षा देणारी कायदा दुरुस्ती झाली आहे. त्यात आजन्म कारावासासोबत द्रव्यदंडाची शिक्षाही आहे. पण कोणत्या गुन्ह्यासाठी किती आर्थिक दंड ठोठावला जाईल हे अजून ठरलेले नाही. देशपातळीवर ड्रग्ज अ‍ॅन्ड कॉस्मेटीक अ‍ॅक्ट १९४० हा कायदा आहे. त्यात औषधांमध्ये भेसळ करणाºयांना जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद आहे. मात्र १९४० पासून आजपर्यंत देशात एकाही व्यक्तीला या कायद्यान्वये जन्मठेप झाल्याचे उदाहरण नाही. कारण त्याच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी, सचिव आणि मंत्री यांची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळेच सलाईनच्या बाटलीत पाणी भरुन विकणारे आणि हृदरोग्यास शस्त्रक्रियेनंतर बनावट स्टेंट टाकणारे महाभाग राज्यात आणि मुंबईत आहेत असा गंभीर आरोप विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

टॅग्स :Adultery Lawव्यभिचार