शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

भेसळीवर नियंत्रण येणार तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 06:12 IST

अन्न व औषध प्रशासन : विभागात ३५ टक्के जागा रिक्त

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : राज्यातील ११ कोटींहून अधिक जनतेची औषध व अन्न सुरक्षा फक्त ८२५ अधिकाऱ्यांकडे आहे. त्यात आयुक्तांपासून शिपायापर्यंतच्या कर्मचाºयांचा समावेश आहे. एकीकडे दूध, खाद्यपदार्थ, औषधांमध्ये भेसळ करणाºयांना आजन्म कारावासाची व या गुन्ह्यात जामीन न देणारा कायदा विधानसभेने मंजूर केला असला तरी या कायद्याची अंमलबजावणी करणे व भेसळ रोखण्यासाठी पुरेसे मनुष्यबळच विभागाकडे नाही.

गट अ ते गट ड या चार प्रवर्गात मंजूर असणाºया ११७६ पदांपैकी तब्बल ४०७ जागा रिक्त आहेत. हे प्रमाण ३४.६० टक्के एवढे प्रचंड आहे. औषध निरीक्षकांची फक्त १६१ पदे मंजूर आहेत, त्यातील ६२ पदे रिक्त आहेत. याचा अर्थ राज्यातील ७५ हजार औषधांची दुकाने तपासण्यासाठी फक्त ९९ अधिकारी आहेत. तर खाद्यपदार्थ विकणाºया तब्बल १७ लाख दुकानांच्या तपासणीसाठी या विभागाकडे फक्त २०९ अधिकारी आहेत.

ही यंत्रणा मजबूत केली पाहिजे म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाने पूर्णपणे नवीन आकृतीबंध तयार केला पण तो तीन वर्षापासून मंजूरीसाठी या विभागातून त्या विभागात खेट्या घालत आहे. परिणामी राज्यात होणारी भेसळ रोखणारी कोणतीही यंत्रणा आजमितीला उभीच राहू शकलेली नाही. खाण्याच्या तेलात पामतेल मिसळले जाते ते पण तपासण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही. त्याशिवाय जागतिक दर्जाची एकही प्रयोगशाळा राज्यात नाही. विषारी औषधांच्या परिणामांचा तपास करणारी, वाया जाणाºया धान्य व फळांवर प्रक्रिया करणारी अशी कोणतीही यंत्रणा राज्यात उपलब्ध नाही.

महाराष्टÑातून जवळपास ५० हजार कोटी रुपयांच्या आसपास औषधांची निर्यात होते पण औषध उत्पादकांना येणाºया अडचणी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीची साधी सिंगल विंडो यंत्रणाही अन्न व औषध प्रशासन विभाग उभी करू शकलेला नाही.

दूध आणि खाद्यपदार्थ, औषधांमध्ये भेसळ करणाºयांना आजन्म कारावासाची शिक्षा देणारी कायदा दुरुस्ती झाली आहे. त्यात आजन्म कारावासासोबत द्रव्यदंडाची शिक्षाही आहे. पण कोणत्या गुन्ह्यासाठी किती आर्थिक दंड ठोठावला जाईल हे अजून ठरलेले नाही. देशपातळीवर ड्रग्ज अ‍ॅन्ड कॉस्मेटीक अ‍ॅक्ट १९४० हा कायदा आहे. त्यात औषधांमध्ये भेसळ करणाºयांना जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद आहे. मात्र १९४० पासून आजपर्यंत देशात एकाही व्यक्तीला या कायद्यान्वये जन्मठेप झाल्याचे उदाहरण नाही. कारण त्याच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी, सचिव आणि मंत्री यांची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळेच सलाईनच्या बाटलीत पाणी भरुन विकणारे आणि हृदरोग्यास शस्त्रक्रियेनंतर बनावट स्टेंट टाकणारे महाभाग राज्यात आणि मुंबईत आहेत असा गंभीर आरोप विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

टॅग्स :Adultery Lawव्यभिचार