शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
4
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
5
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
6
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
7
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
8
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
9
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
10
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
11
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
12
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
13
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
14
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
15
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
16
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
17
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
18
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
19
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
20
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला

भेसळीवर नियंत्रण येणार तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 06:12 IST

अन्न व औषध प्रशासन : विभागात ३५ टक्के जागा रिक्त

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : राज्यातील ११ कोटींहून अधिक जनतेची औषध व अन्न सुरक्षा फक्त ८२५ अधिकाऱ्यांकडे आहे. त्यात आयुक्तांपासून शिपायापर्यंतच्या कर्मचाºयांचा समावेश आहे. एकीकडे दूध, खाद्यपदार्थ, औषधांमध्ये भेसळ करणाºयांना आजन्म कारावासाची व या गुन्ह्यात जामीन न देणारा कायदा विधानसभेने मंजूर केला असला तरी या कायद्याची अंमलबजावणी करणे व भेसळ रोखण्यासाठी पुरेसे मनुष्यबळच विभागाकडे नाही.

गट अ ते गट ड या चार प्रवर्गात मंजूर असणाºया ११७६ पदांपैकी तब्बल ४०७ जागा रिक्त आहेत. हे प्रमाण ३४.६० टक्के एवढे प्रचंड आहे. औषध निरीक्षकांची फक्त १६१ पदे मंजूर आहेत, त्यातील ६२ पदे रिक्त आहेत. याचा अर्थ राज्यातील ७५ हजार औषधांची दुकाने तपासण्यासाठी फक्त ९९ अधिकारी आहेत. तर खाद्यपदार्थ विकणाºया तब्बल १७ लाख दुकानांच्या तपासणीसाठी या विभागाकडे फक्त २०९ अधिकारी आहेत.

ही यंत्रणा मजबूत केली पाहिजे म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाने पूर्णपणे नवीन आकृतीबंध तयार केला पण तो तीन वर्षापासून मंजूरीसाठी या विभागातून त्या विभागात खेट्या घालत आहे. परिणामी राज्यात होणारी भेसळ रोखणारी कोणतीही यंत्रणा आजमितीला उभीच राहू शकलेली नाही. खाण्याच्या तेलात पामतेल मिसळले जाते ते पण तपासण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही. त्याशिवाय जागतिक दर्जाची एकही प्रयोगशाळा राज्यात नाही. विषारी औषधांच्या परिणामांचा तपास करणारी, वाया जाणाºया धान्य व फळांवर प्रक्रिया करणारी अशी कोणतीही यंत्रणा राज्यात उपलब्ध नाही.

महाराष्टÑातून जवळपास ५० हजार कोटी रुपयांच्या आसपास औषधांची निर्यात होते पण औषध उत्पादकांना येणाºया अडचणी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीची साधी सिंगल विंडो यंत्रणाही अन्न व औषध प्रशासन विभाग उभी करू शकलेला नाही.

दूध आणि खाद्यपदार्थ, औषधांमध्ये भेसळ करणाºयांना आजन्म कारावासाची शिक्षा देणारी कायदा दुरुस्ती झाली आहे. त्यात आजन्म कारावासासोबत द्रव्यदंडाची शिक्षाही आहे. पण कोणत्या गुन्ह्यासाठी किती आर्थिक दंड ठोठावला जाईल हे अजून ठरलेले नाही. देशपातळीवर ड्रग्ज अ‍ॅन्ड कॉस्मेटीक अ‍ॅक्ट १९४० हा कायदा आहे. त्यात औषधांमध्ये भेसळ करणाºयांना जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद आहे. मात्र १९४० पासून आजपर्यंत देशात एकाही व्यक्तीला या कायद्यान्वये जन्मठेप झाल्याचे उदाहरण नाही. कारण त्याच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी, सचिव आणि मंत्री यांची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळेच सलाईनच्या बाटलीत पाणी भरुन विकणारे आणि हृदरोग्यास शस्त्रक्रियेनंतर बनावट स्टेंट टाकणारे महाभाग राज्यात आणि मुंबईत आहेत असा गंभीर आरोप विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

टॅग्स :Adultery Lawव्यभिचार