शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

घरबांधणीला आता येणार सुगीचे दिवस, केंद्रच देणार अडीच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 6:47 AM

परवडणा-या घरांच्या बांधकामाला चालना देण्यासाठी सरकारी-खासगी भागीदारी तत्त्वावरील प्रकल्पात खासगी भूखंडावर बिल्डरकडून बांधण्यात येणा-या प्रत्येक घरासाठी केंद्राकडून सध्याच्या दीड लाखांऐवजी अडीच लाख रुपये अर्थसाह्य मिळणार आहे.

मुंबई : परवडणा-या घरांच्या बांधकामाला चालना देण्यासाठी सरकारी-खासगी भागीदारी तत्त्वावरील प्रकल्पात खासगी भूखंडावर बिल्डरकडून बांधण्यात येणा-या प्रत्येक घरासाठी केंद्राकडून सध्याच्या दीड लाखांऐवजी अडीच लाख रुपये अर्थसाह्य मिळणार आहे. त्यामुळे घरबांधणीला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे. शिवाय सध्याची योजनाही सुरूच राहील.अर्थात लहान शहरांत बांधली जाणारी घरे विकत घेणे गरिबांना सोयीचे होईल. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी मुंबईत ‘नरेडको’ या बांधकाम व्यावसायिकांच्या परिषदेत हे धोरण जाहीर केले. आतापर्यंत पंतप्रधान आवास योजनेत केंद्रातर्फे दीड लाखाचे अर्थसाहाय्य मिळत होते. आता केंद्र सरकारने ‘पीपीपी’ तत्त्वावरील घरांसाठीही एक लाख जादा अर्थसाहाय्य जाहीर केले आहे.पंतप्रधान आवास योजनेत केंद्राकडून दीड लाख व राज्य सरकारकडून एकलाख अशी आतापर्यंतची योजना होती. आता केंद्रानेच अडीच लाखांचे साह्य दिल्यास, त्यावर राज्य सरकार आणखीएक लाख देणार का, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. मात्र आतापर्यंतची केंद्राची दीड लाख रुपयांच्या अर्थसाह्याची योजनाही सुरूच राहणार असून, त्यात राज्याकडूनही एक लाख रुपये अर्थसाह्य मिळेल.सन २०२२ सालापर्यंत प्रत्येक नागरिकाला घर देण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी भूखंडांचा योग्य वापर करून परवडणारी घरे बांधण्यासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री पुरी यांनी स्पष्ट केले.>सर्वांना हक्काचे घर!मुंबईतील घरांच्या किमती खाली आणण्यात सरकार यशस्वी ठरल्यास त्या मॉडेलचा वापर राज्यासह देशात केला जाईल. जमिनीचे भाव गगनाला भिडल्याने मुंबईतील मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मिठागराच्या जमिनीसह झोपडपट्ट्यांच्या जमिनीचा विकास करता येईल. या ठिकाणी परवडणारी घरे उभारल्यानंतर त्यास मिळणाºया अनुदानामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना हक्काचे मिळू शकेल, असे डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले.>प्रधानमंत्री आवास योजनेच्या कर्जाशी संलग्न अनुदानांतर्गत बँक कर्जावर व्याज सवलत देण्यात येईल. प्रत्येक घरासाठी ही सवलत अंदाजे अडीच लाख रुपयांपर्यंत असेल. यामुळे २०१७ सालापासून २०२२ पर्यंत बिल्डर व ग्राहकांची दिवाळी असेल, अशी प्रतिक्रिया ‘नरेडको’चे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केली.