शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राज्यात होरपळ सुरुच; उष्माघाताचे तीन बळी, चंद्रपूर ४६ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 05:26 IST

प्रखर उन्हामुळे विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशाची होरपळ सुरूच असून उष्माघाताने तिघांचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी उघडकीस आले. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

पुणे - प्रखर उन्हामुळे विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशाची होरपळ सुरूच असून उष्माघाताने तिघांचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी उघडकीस आले. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ मध्य महाराष्ट्रात गुरुवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.अमरावती जिल्ह्यात उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला. राजेश विश्वास अंबाडकर (४८, रा. जुनीवस्ती, बडनेरा) हे शेतात काम करीत असताना चक्कर येऊन कोसळले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. धामणगाव रेल्वे येथे अंजनसिंगी मार्गावरील एका ढाब्याजवळ ३५ वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी आढळून आला. तो भिकारी असून त्याचा पाण्याअभावी मृत्यू झाल्याचे सांगणयात येत आहे. हा उष्माघाताचा बळी असल्याचे पोलीस अहवालात नमूद आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव (ता. जरंडी) येथील सुनील पंडित लोहार (३९) यांचा सोमवारी उष्माघाताने मृत्यू झाला. लोहार यांनी रविवारी दिवसभर भात्याजवळ काम केले. भात्याची उष्णता आणि उन्हाची दाहकता यामुळे चक्कर आल्याने त्यांना रात्री खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांचे निधन झाले.राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)पुणे ३७़४, लोहगाव ३९़३, अहमदनगर ४३, जळगाव ४२़८, कोल्हापूर ३७़५, महाबळेश्वर ३२़७, मालेगाव ४२़२, नाशिक ३८़१, सांगली ३९, सातारा ३९़७, सोलापूर ४२़१, मुंबई ३३़५, सातांक्रुझ ३३़७,अलिबाग ३३़१, रत्नागिरी ३४़२, पणजी ३५़२, डहाणू ३४़७, औरंगाबाद ३९़५, नांदेड ४३़५, अकोला ४३, अमरावती ४२़८, बुलढाणा ३९़८, चंद्रपूर ४६, गोंदिया ४२़८, नागपूर ४४़४, वर्धा ४४, यवतमाळ ४३

टॅग्स :weatherहवामानMaharashtraमहाराष्ट्र