शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

रणरागिणींच्या वेदनेचा हुंकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 4:34 AM

आझाद मैदानावर बुधवारी भगवा जनसागर लोटला होता. मराठा समाजावरील अन्यायाला वाचा फोडणारी रणरागिणींची भाषणे झाली, त्यांचा हुंकार पाहायला मिळाला.

सचिन लुंगसे मुंबई : आझाद मैदानावर बुधवारी भगवा जनसागर लोटला होता. मराठा समाजावरील अन्यायाला वाचा फोडणारी रणरागिणींची भाषणे झाली, त्यांचा हुंकार पाहायला मिळाला. आम्ही आज येथे न्याय मागण्यास आलेलो नाही तर न्याय घेण्यास आलो आहोत, असे सांगत त्यांनी मैदान दणाणून सोडले. आर्या माने, प्रचिती सावंत, वैष्णवी डाफ, पूजा मोरे, स्नेहल सपताळ, भावना देशमुख, काजल गुंजाळ, अर्चना भोर, रसिका शिंदे, दिव्या महाले, दिव्या साळुंखे, आकांक्षा पवार आणि सुरेखा गावकर यांनी समाजाची भावना बोलून दाखविली.प्रारंभी मराठा मोर्चाच्या प्रस्तावनेचे वाचन झाले. कोपर्डी प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि तातडीने न्याय दिला जाईल, असे आश्वासन सरकारने दिले होते. त्याचे काय झाले, असा सवाल एक तरुणीने केला. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. मात्र सरकार काहीच कार्यवाही करत नाही. अत्याचारासारख्या प्रकरणांत जात, धर्म आणि पंथ पाहता कामा नये. केवळ कोपर्डीच नाही, तर अत्याचाराच्या घटनेत आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आजघडीला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला जात आहे. चुकीच्या प्रकरणांत लोकांना गोवले जात आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. अशा घटनांचे राजकारण करता कामा नये. मात्र याप्रश्नी सरकार गंभीर नाही.सरकार म्हणते कायद्याचे राज्य आहे. जर कायद्याचे राज्य असेल तर मग आम्हाला न्याय का मिळत नाही? कायदा नक्की कुठे आहे? दिलेले वचन सरकार का पाळत नाही? मराठा समाज उदारमतवादी आहे. मात्र आमचा गैरफायदा घेऊ नका. आज आम्ही मुंबईत धडकलो आहोत. आणि आता जर आमची दखल घेतली नाही, तर मग आम्ही दिल्ली हादरवून टाकू, असा इशारा त्यांनी दिला.आता अभ्यास बंद करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणतेही प्रकरण दाखल केले की आम्ही अभ्यास करून हा प्रश्न सोडवू, असे ते म्हणतात. मात्र आणखी किती दिवस तुम्ही अभ्यास करणार. तुमचे गुरुजी नक्की आहेत तरी कोण? असा सवाल एका मुलीने केला.आम्ही जिजाऊच्या लेकीआम्ही जिजाऊच्या लेकी आहोत. आम्ही शांत आहोत. मात्र जर आम्ही मनात आणले आणि आक्रमक झालो तर मात्र सरकारला महाग पडेल, असाही इशारा एका संतप्त मुलीने दिला.‘एक मराठा, लाख मराठा’प्रत्येकाच्या भाषणाचा शेवट ‘एक मराठा, लाख मराठा...’ने होत होता. ‘मराठा समाजाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका...’ या वाक्यावर उपस्थित समुदायाकडून टाळ्यांचा गजर झाला.शिवस्मारकाचे काय झालेशिवस्मारकाच्या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र त्यानंतर कामाबाबत सरकारने एक शब्द काढलेला नाही. नक्की काम सुरू झाले आहे का? आणि सुरू झाले असेल तर किती झाले आहे? याबाबत सरकार काहीच बोलत नाही. शिवस्मारकाचे काम लवकर करण्यात यावे, असाही मुद्दा एका मुलीने उपस्थित केला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा