शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

वणव्यामुळे घर खाक

By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST

मोहाफुल वेचण्याकरीता ग्रामस्थांकडून जंगलात लावण्यात आलेल्या आगीचा वणवा गावापर्यंत पसरल्याने दोन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

देवरी : मोहाफुल वेचण्याकरीता ग्रामस्थांकडून जंगलात लावण्यात आलेल्या आगीचा वणवा गावापर्यंत पसरल्याने दोन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात एका शेतकऱ्याचे घर जळून पूर्णपणे राख झाल्याची घटना शनिवारला दु.१ वाजता मल्हारबोडी गावात घडली. देवरीपासून ५ किमी अंतरावर असलेले मल्हारबोडी हे गाव १५ ते २० घरांचे आहे. गावातील महिला पुरूष मग्रारोहयोच्या कामावर गेले होते. काही लोकांनी मोहफुल वेचण्याकरीता जंगलाला आग लावल्यामुळे ती आग गावापर्यंत पोहोचली. या आगीमुळे गावातील वाड्या, तणसाचे ढिगारे, शेतातील सिंचनाचे पाईप व एका शेतकऱ्यांचे मकान पूर्णत: जळून राख झाले. घर जळालेल्या शेतकऱ्यांचे नाव मोतीनाथ काशीनाथ ठाकरे (६६) असे आहे. ते एकटेच आपल्या घरात राहात होते. याप्रसंगी ते घरात झोपलेले होते. गावात कोणीच ग्रामस्थ नसल्याने आग विझविता न आल्याने मोतीनाथ ठाकरे यांचे घर राख झाले. या शेतकऱ्याच्या घराला लागून असलेले लक्ष्मण दागो प्रधान (६०) यांच्या घराबाहेर ठेवलेले सिंचन पाईप पूर्णपणे जळाले. तसेच तणसाचे ढिगारे पूर्णपणे जळाले. घटनेची बातमी कळताच देवरीचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी देवरी व चिचेवाड्यावरुन पाण्याचा टॅकरची व्यवस्था करून आग आटोक्यात आणली. दोन्ही शेतकऱ्यांना सांत्वना देत सरकारी मदत देण्याचे आश्वासन दिले. या वणव्यामुळे मल्हारबोडी गावातील लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्वरीत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)