शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

सरकारच्या निर्णयघाईला दणका! राज्यपालांनी ३ दिवसांतील सरकारी निर्णयांच्या फायली मागविल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 11:33 IST

या तीन दिवसांत काढलेले जीआर, परिपत्रकेच नव्हे तर घेतलेल्या अन्य निर्णयांचीही माहिती मला द्यावी, असे राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे.

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने २२ जून ते २४ जून या तीन दिवसांत घेतलेल्या अनेक निर्णयांच्या फायली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागविल्या आहेत. संशयास्पद निर्णय घेण्यात आल्याच्या तक्रारीवर त्यांनी राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांना पत्र लिहिले आहे.या तीन दिवसांत अनेक संशयास्पद निर्णय विशिष्ट हेतूने घेण्यात आले. त्यामुळे ते तातडीने रद्द करावेत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन केली होती. कोरोनामुक्त होऊन इस्पितळातून परतताच त्या पत्राची दखल घेत राज्यपालांनी दणका दिला आहे.

निर्णयाची माहिती द्या!या तीन दिवसांत काढलेले जीआर, परिपत्रकेच नव्हे तर घेतलेल्या अन्य निर्णयांचीही माहिती मला द्यावी, असे राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे. राज्यपालांच्या या पत्रावर प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यपालांनी तीन दिवसांतील निर्णयांची तर माहिती घ्यावीच, शिवाय २१ जूनपासून घेण्यात आलेल्या सर्व निर्णयदेखील तपासावेत.

‘त्या’ १२ जणांची यादी रद्द होणार!राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये वेगळे सरकार आले तर महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना विधान परिषदेवरील नियुक्तीसाठी केलेली शिफारस रद्द होईल. नवीन सरकारकडून नव्याने नावे पाठविली जातील.

शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे-पाटील, विजय कारंजकर आणि चंद्रकात रघुवंशी अशी नावे दिली होती. राष्ट्रवादीतर्फे माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी खासदार राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि संगीतकार आनंद शिंदे यांची नावे होती. काँग्रेसतर्फे प्रवक्ते सचिन सावंत, गायक अनिरुद्ध वनकर, मुजफ्फर हुसेन आणि रजनी पाटील यांची नावे देण्यात आली होती.

यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे हे अलीकडेच विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. रजनी पाटील यांना काँग्रेसने राज्यसभेवर पाठविले आहे तर राजू शेट्टी यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपले नाव त्या यादीतून वगळा, अशी मागणी केली होती.

७ नोव्हेंबर २०२० रोजी महाविकास आघाडी सरकारकडून ही नावे राज्यपालांकडे पाठविण्यात आली. मात्र, तेव्हापासून राज्यपालांनी या नावांना नियुक्ती दिली नाही. १२ जणांच्या यादीत तीन पक्षांची प्रत्येकी चार नावे होती. यावरून अनेकदा वाद निर्माण झाला आहे. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी