भारताच्या कसोटी विजयातील ऐतिहासिक क्षण
By Admin | Updated: September 22, 2016 00:00 IST2016-09-22T00:00:00+5:302016-09-22T00:00:00+5:30

भारताच्या कसोटी विजयातील ऐतिहासिक क्षण
कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेला सामना आजही क्रिकेट रसिकांच्या लक्षात आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणच्या २८१ धावांच्या खेळीमुळे भारताला विजय मिळवता आला. पहिल्या डावातील ऑस्ट्रेलियाच्या ४४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव १७१ धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाने भारताला फोलोऑन देऊन पुन्हा फलंदाजीची संधी दिली. भारताने दुस-या डावात ६५७ धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३८३ धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाचा डाव २१२ धावात आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने १७१ धावांची नोंद केली.