शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

सरकारच्या कारभारावर हायकोर्ट नाराज

By admin | Updated: June 29, 2017 02:11 IST

मराठवाडा पाणी प्रश्नासंदर्भात सप्टेंबर २०१६ मध्ये देण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सरकार उदासिन असल्याचे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठवाडा पाणी प्रश्नासंदर्भात सप्टेंबर २०१६ मध्ये देण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सरकार उदासिन असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. २९ सप्टेंबर २०१६ रोजी दिलेल्या आदेशाची पूर्तता केव्हा करणार? अशी विचारणा करत न्यायालयाने हे स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी अखेरची संधी दिली.जल कायदा अस्तित्वात असूनही व त्याचे पालन करण्याचे निर्देश देऊनही राज्य सरकारने कागदी घोडे नाचवण्यापलिकडे काहीच केल नसल्याने न्या. अभय ओक व न्या. विभा कंकणवाडी यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. ‘२००५ चा कायदा असून १२ वर्षे उलटली तरीही राज्य सरकारने कशाला प्राधान्य द्यायचे, हे अद्याप ठरविले नाही,’ असे न्यायालयाने म्हटले.उच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर २०१६ रोजी दिलेल्या आदेशाची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ मागण्याकरिता सरकारने न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर बुधवारी सुनावणी होती. सुनावणीत न्यायालयाचे आदेश पाळण्याबाबत सरकार प्रामाणिक मेहनत घेणार नाही, तोपर्यंत आम्ही अर्ज (मुदतवाढीचा अर्ज) स्वीकारणार नाही,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले.दरम्यान, उच्च न्यायालयाने गेल्यावर्षीच्या आदेशात गोदावरी खोऱ्याचे कार्यक्षेत्र निश्चित करण्याबाबत म्हटले होते. यासाठी साडेपाच हजार कोटींची आर्थिक तरतूद करणे आवश्यक असतानाही यंदासाठी केवळ ३८ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याची बाब याचिकाकर्त्यांचे वकील प्रदीप देशमुख यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणली. ‘राज्य सरकारने केलेली आर्थिक तरतूद एकूण आर्थिक तरतुदीच्या एक टक्केही नाही. सरकार अशारीतीने आर्थिक तरतूद करत राहिले तर हे काम कासवगतीने पूर्ण होईल,’ असे देशमुख यांनी सांगितले. न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य करत गोदावरी खोऱ्याचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी निधी कशाप्रकारे उपलब्ध करणार, याचीही माहिती प्रतिज्ञापत्रात देण्याचे निर्देश दिले.