शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

महाराष्ट्र सरकारला हायकोर्टाचा लाखाचा दंड; पोलिसांविरोधातील तक्रार गांभीर्याने न घेणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 06:04 IST

Bombay High Court: हे प्रकरण २०१२ चे आहे. रत्ना वन्नम यांचे पती चंद्रकांत वन्नम यांना बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

मुंबई : पोलिसांच्या गैरवर्तनाबद्दल तक्रार करूनही त्यास गांभीर्याने न घेतल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच पोलिसांच्या गैरवर्तनाबद्दल न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली. पोलिसांविरोधातील आरोप गांभीर्याने घेण्यात आले नाहीत. त्यामुळे नागरिकांचा विश्वास बसत नाही, असे न्या. भारती डांग्रे आणि न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने म्हटले. एका महिलेच्या पतीला बेकायदा अटक केल्याप्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही नाराजी व्यक्त केली. 

हे प्रकरण २०१२ चे आहे. रत्ना वन्नम यांचे पती चंद्रकांत वन्नम यांना बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. वन्नम यांच्या शेजाऱ्यांनी त्यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली. वन्नम यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांच्याविरोधात बेकायदा बांधकामाची तक्रार केली.  

आपली छळवणूक केल्याची तक्रार करण्यासाठी वन्नम वडाळा टी. टी. पोलिस ठाण्यात गेले. परंतु, त्यांची तक्रार अन्य पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येते, असे म्हणत पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी चंद्रकांत वन्नम आणि कन्स्ट्रक्शन साईटवरून पाच जणांना अटक केली.

सुटकेसाठी मागितले १२ हजार

सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम जाधव यांनी चंद्रकांत वन्नम यांना सोडण्यासाठी १२ हजार रुपयांची मागणी केली  आणि प्रत्येक कामगाराला सोडण्यासाठी प्रत्येकी १२०० रुपयांची मागणी केली.

कर्मचाऱ्यांसाठी असलेला दंड भरल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, चंद्रकांत यांची जामीन मिळेपर्यंत सुटका करण्यात आली नाही.

अटक अनावश्यक

जाधव यांनी चंद्रकांत यांच्याविरोधातील प्रकरण बंद करण्यासाठी त्यांच्या पत्नीकडे १० हजारांची मागणी केली होती.

नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचेल, अशा अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध करणाऱ्या महाराष्ट्र पोलिस कायद्याचा संदर्भ देत पोलिसांनी चंद्रकात यांना अटक केल्याचे सांगितले. मात्र, या प्रकरणी अटकेची आवश्यकता नव्हती, असे न्यायालयाने म्हटले.

याचिकाकर्त्याला त्रास

जाधव यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश असूनही जाधव यांना केवळ २००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या अधिकारांचा आणि कायद्याच्या केलेल्या गैरवापराचे हे उत्तम उदाहरण आहे. 

याचिकाकर्त्याला नाहक त्रास सहन करावा लागला आणि जाधव यांच्यावर कारवाईचे निर्देश देऊनही ती करण्यात आली नाही, असे सांगत न्यायालयाने वन्नमा यांच्या पत्नीला एक लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिसMumbaiमुंबई