शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

महाराष्ट्र सरकारला हायकोर्टाचा लाखाचा दंड; पोलिसांविरोधातील तक्रार गांभीर्याने न घेणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 06:04 IST

Bombay High Court: हे प्रकरण २०१२ चे आहे. रत्ना वन्नम यांचे पती चंद्रकांत वन्नम यांना बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

मुंबई : पोलिसांच्या गैरवर्तनाबद्दल तक्रार करूनही त्यास गांभीर्याने न घेतल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच पोलिसांच्या गैरवर्तनाबद्दल न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली. पोलिसांविरोधातील आरोप गांभीर्याने घेण्यात आले नाहीत. त्यामुळे नागरिकांचा विश्वास बसत नाही, असे न्या. भारती डांग्रे आणि न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने म्हटले. एका महिलेच्या पतीला बेकायदा अटक केल्याप्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही नाराजी व्यक्त केली. 

हे प्रकरण २०१२ चे आहे. रत्ना वन्नम यांचे पती चंद्रकांत वन्नम यांना बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. वन्नम यांच्या शेजाऱ्यांनी त्यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली. वन्नम यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांच्याविरोधात बेकायदा बांधकामाची तक्रार केली.  

आपली छळवणूक केल्याची तक्रार करण्यासाठी वन्नम वडाळा टी. टी. पोलिस ठाण्यात गेले. परंतु, त्यांची तक्रार अन्य पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येते, असे म्हणत पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी चंद्रकांत वन्नम आणि कन्स्ट्रक्शन साईटवरून पाच जणांना अटक केली.

सुटकेसाठी मागितले १२ हजार

सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम जाधव यांनी चंद्रकांत वन्नम यांना सोडण्यासाठी १२ हजार रुपयांची मागणी केली  आणि प्रत्येक कामगाराला सोडण्यासाठी प्रत्येकी १२०० रुपयांची मागणी केली.

कर्मचाऱ्यांसाठी असलेला दंड भरल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, चंद्रकांत यांची जामीन मिळेपर्यंत सुटका करण्यात आली नाही.

अटक अनावश्यक

जाधव यांनी चंद्रकांत यांच्याविरोधातील प्रकरण बंद करण्यासाठी त्यांच्या पत्नीकडे १० हजारांची मागणी केली होती.

नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचेल, अशा अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध करणाऱ्या महाराष्ट्र पोलिस कायद्याचा संदर्भ देत पोलिसांनी चंद्रकात यांना अटक केल्याचे सांगितले. मात्र, या प्रकरणी अटकेची आवश्यकता नव्हती, असे न्यायालयाने म्हटले.

याचिकाकर्त्याला त्रास

जाधव यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश असूनही जाधव यांना केवळ २००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या अधिकारांचा आणि कायद्याच्या केलेल्या गैरवापराचे हे उत्तम उदाहरण आहे. 

याचिकाकर्त्याला नाहक त्रास सहन करावा लागला आणि जाधव यांच्यावर कारवाईचे निर्देश देऊनही ती करण्यात आली नाही, असे सांगत न्यायालयाने वन्नमा यांच्या पत्नीला एक लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिसMumbaiमुंबई