शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

दुरुस्तीसाठी वरसावे पुलावर अवजड वाहनांना १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 21:03 IST

मुंबई अहमदाबाद महामार्गा वरील वरसावे खाडीवरच्या जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना १३ नोव्हेम्बरच्या मध्यरात्री नंतर  ते १५ नोव्हेम्बरच्या रात्री ११ . ५५ पर्यंत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे .  

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मुंबई अहमदाबाद महामार्गा वरील वरसावे खाडीवरच्या जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना १३ नोव्हेम्बरच्या मध्यरात्री नंतर  ते १५ नोव्हेम्बरच्या रात्री ११ . ५५ पर्यंत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे .  

वरसावे येथील जुन्या पुलाचा वापर हा वसई - गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी केला जातो . परंतु सदर पूल हा खूपच जुना व जीर्ण झाला असून सुरक्षीततेच्या दृष्टीने आता तातडीची दुरुस्ती आवश्यक असल्याने त्यासाठी ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान जुन्या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याची अधिसूचना मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे परिमंडळ १ चे उपायुक्त अमित काळे यांनी जरी केली होती . परंतु ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्तांनी पत्र पाठवून दिवाळीत मुंबई - नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची असलेली वाहतूक आणि डायव्हर्शन रस्त्याच्या डागडुजूची कामे बाकी असल्याने दिवाळी नंतर बंदीचा निर्णय घेण्यास कळवले होते . त्या अनुषंगाने ती अधिसूचना रद्द केली होती . 

आता उपायुक्त काळे यांनी वरसावे पुलाच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने नव्याने अधिसूचना जारी केली आहे . त्या नुसार १३ ते १५ च्या मध्यरात्री पर्यंत असे तीन दिवस जुन्या पुलावरून अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे . 

जुन्या पुलावरून दोन पैकी एकाच मार्गिकेवरून लहान वाहनांची वाहतूक सुरु ठेवली जाणार आहे . त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार आहे . बॅरेकेटिंग लावून सलग तीन दिवस पुलाची एकच मार्गिका हलक्या वाहनांसाठी असणार असल्याने ठाणे येथून पालघर, गुजरात कडे जाणारी जड अवजड वाहने ही वरसावे पुलावरून न जाता अन्य  पर्यायी मार्गावरुन केली जाणार आहे. 

ठाणे शहरातून वर्सोवा मार्गे पालघर सुरत बाजूकडे जाणारी जड-अवजड वाहने ही मुंब्रा - खारेगाव टोलनाका – मानकोली – भिवंडी- वाडा – मनोर – पालघर – मार्गे जातील. दुसऱ्या पर्याय हा मुंब्रा – खारेगाव टोलनाका – मानकोली – भिंवडी – नदी नाका – अंबाडी – वज्रेश्वरी – गणेशपूरी – शिरसाट फाटा मार्गे जातील. तर मुंब्रा – खारेगाव टोलनाका – मानकोली – अंजूर फाटा – कामण-चिंचोटी – वसई विरार महानगरपालिका हद्दी मार्गे जातील. 

यातून महसूल विभागाची वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ह्या बंदीतून सवलत देण्यात आली आहे . या दिवसात वरसावे पूल आणि परिसरातील महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता या मार्गावरून अनावश्यक कारणा शिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे . पर्यटक आणि बाहेरगावी जाणाऱ्यांनी देखील याची नोंद घ्यावी असे म्हटले आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर