शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

मराठवाड्याच्या काही भागांत अतिवृष्टी; बीड जिल्ह्यात ५ गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 06:31 IST

नांदेड जिल्ह्यातील ४ तालुक्यांतील ८ महसूल मंडळांत सोमवारी अतिवृष्टीची नोंद झाली. बिलोली तालुक्यातील सगरोळी मंडळात ८६.९० मिमी. पाऊस झाला.

औरंगाबाद : मराठवाड्याच्या काही भागांत गेल्या चोवीस तासांत मुसळधार पाऊस पडला. लातूर, नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. पावसामुळे तूर, सोयाबीनला दिलासा मिळाला तरी काढणीला आलेल्या मूग व उडीद पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिकांत पाणी साचल्याने सोयाबीनलाही धोका निर्माण झाला आहे़नांदेड जिल्ह्यातील ४ तालुक्यांतील ८ महसूल मंडळांत सोमवारी अतिवृष्टीची नोंद झाली. बिलोली तालुक्यातील सगरोळी मंडळात ८६.९० मिमी. पाऊस झाला. आदमपूर मंडळात ९४.५० व लोहगाव मंडळात ९३.०० मिमी. पाऊस झाला. मुखेड तालुक्यात चांडोळा ९७.७५ मिमी. आणि देगलूर तालुक्यात ७५.७५ मिमी., खानापूर मंडळात ८३.७५ मिमी. आणि शहापूर मंडळात सर्वाधिक १०६.२५ मिमी. पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात चार महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.त्यात देवणी ८४.५, बोरोळ १२७.५, मोघा ८०.५ आणि नागलगाव महसूल मंडळात ७७.५ मिमी. पाऊस झाला.बीड जिल्ह्यात शिरूर कासार येथील सिंदफणा धरणदेखील मागील काही दिवसांपासून सांडव्यावरून वाहत आहे. सिंदफणा नदीची महापुराकडे वाटचाल सुरू आहे.परभणी जिल्ह्यातील पालम शहराजवळून वाहणाऱ्या लेंडी नदीला मंगळवारी दुपारी पूर आल्याने नदीपलीकडील पाच गावांचा संपर्क तुटला. गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्प तुडुंब झाला. अर्ध्या उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी पहाटे दमदार पावसाने हजेरी लावली आहे़ तेरणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. जालना शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी पावसाचे जोरदार पुनरागमन झाले.

टॅग्स :Rainपाऊस