शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आजपासून 'तो' पुन्हा मेघगर्जनेसह कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 12:57 IST

पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईतही काही भागांत हलक्या, तर काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सध्या परतीच्या पावसाचा वेग वाढला आहे. परतीचा पाऊस आता राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि हिमाचल प्रदेशमध्ये दाखल झाला आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पावसाची नोंद झाली आहे, तर याच काळात देशात १०६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. १ आणि २ ऑक्टोबरला कोकणासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. सोबत मराठवाड्यात विजाही कडाडतील.

३ ऑक्टोबरला पावसाचा जोर किंचित कमी होईल. कोकण आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण नोंदविण्यात आले.

टॅग्स :RainपाऊसMumbaiमुंबई