शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Heavy Rain Alert: कोकणसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार? विजांच्या कडकडाटासह गडगडाट होण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 11:13 IST

ऑगस्ट - सप्टेंबर शेवटच्या दोन महिन्यांत देशासाठी सरासरी ४२ सेमी अपेक्षित असतो.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यात हवामानातील उल्लेखनीय बदलामुळे येत्या चार दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात विजांच्या कडकडाटासह गडगडाट होण्याची शक्यता आहे. याशिवाय कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

ऑगस्ट - सप्टेंबर शेवटच्या दोन महिन्यांत देशासाठी सरासरी ४२ सेमी अपेक्षित असतो. महाराष्ट्रात पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण व कोल्हापूर वगळता पाऊस हा दोन महिन्यांच्या सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यताही ३५-४५ टक्के असते. त्यामुळे दोन महिन्यांत सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये देशासाठी सरासरी २५ सेमी पाऊस अपेक्षित असतो. 

मात्र यावर्षी महाराष्ट्रात पाऊस हा ऑगस्टच्या  सरासरी किंवा सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता ३५ ते ४५ टक्के जाणवते, अशी माहिती हवामान विभागाचे माजी अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. दरम्यान,गेल्या २४ तासांत गोव्यासह राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जरी कमी दिसत असले तरी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत मिळून राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल.- कृष्णानंद होसाळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग.

टॅग्स :Rainपाऊस