शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक : नाशिकमध्ये तलावात बुडून माय-लेकींसह सूनेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 20:21 IST

बेळगाव ढगा सहावा मैल शिवारातील महालक्ष्मीनगर येथे अरुण शिंदे हे कुटुंबासमवेत राहतात. त्यांच्या पत्नी मनीषा शिंदे (४२), रुतुजा अरुण शिंदे (१६), वृषाली अरुण शिंदे (२१) व अरुण शिंदे यांच्या मोठ्या भावाचा मुलगा नीलेशची पत्नी आरती शिंदे (२१) या चौघी येथील नंदीनी नदीला येऊन मिळणा-या नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधा-यावर धुणीभांडी करायला गेल्या होत्या.

ठळक मुद्देनाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केली शिंदे कुटुंबातील महिला, मुली धुणीभांडी करण्यासाठी बंधा-यावर गेल्या होत्या

नाशिक : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेळगाव ढगा शिवारात असलेल्य बंधाऱ्यात बुडून एकाच कुटुंबातील मायलेकींसह सूनेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरूवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास धुणीभांडी करण्यासाठी शिंदे कुटुंबातील महिला, मुली येथील बंधा-यावर गेल्या होत्या. त्या दरम्यान, एकमेकींना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघींनाही आपले प्राण गमवावे लागले. शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या हृदयद्रावक घटनेने संपुर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेळगाव ढगा सहावा मैल शिवारातील महालक्ष्मीनगर येथे अरुण शिंदे हे कुटुंबासमवेत राहतात. त्यांच्या पत्नी मनीषा शिंदे (४२), रुतुजा अरुण शिंदे (१६), वृषाली अरुण शिंदे (२१) व अरुण शिंदे यांच्या मोठ्या भावाचा मुलगा नीलेशची पत्नी आरती शिंदे (२१) या चौघी येथील नंदीनी नदीला येऊन मिळणा-या नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधा-यावर धुणीभांडी करायला गेल्या होत्या. यावेळी चौघींपैकी एकीचा पाय घसरुन पाण्यात पडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून एकमेकींना वाचविण्यासाठी एकापाठोपाठ पाण्यात उतरलेल्या या चौघींनाही पाण्याचा अंदाज न आल्याने नाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातपूर पोलिसांनी केली आहे. रुतुजा शहरातील व्ही.एन.नाईक महाविद्यालयात वाणिज्य शाखेत इयत्ता ११वीला शिक्षण घेत होती तर वृषाली ही केटीएचएम महाविद्यालयात विज्ञान शाखेत पदवीच्या द्वितीय वर्गात शिकत होती. घटनेची माहिती मिळताच बेळगाव ढगा गावातील स्थानिक तरुणांनी बंधा-याच्या दिशेने धाव घेतली. तसेच पोलीस व अग्निशामक दलाला माहिती कळविण्यात आली. सातपूर पोलीस ठाण्याचे पथक व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी बंधाºयात उतरुन चौघींनाही पाण्यातून बाहेर काढले होते. चौघींनाही तत्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता वैद्यकिय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले.

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरAccidentअपघात