शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

हृदयद्रावक : नाशिकमध्ये तलावात बुडून माय-लेकींसह सूनेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 20:21 IST

बेळगाव ढगा सहावा मैल शिवारातील महालक्ष्मीनगर येथे अरुण शिंदे हे कुटुंबासमवेत राहतात. त्यांच्या पत्नी मनीषा शिंदे (४२), रुतुजा अरुण शिंदे (१६), वृषाली अरुण शिंदे (२१) व अरुण शिंदे यांच्या मोठ्या भावाचा मुलगा नीलेशची पत्नी आरती शिंदे (२१) या चौघी येथील नंदीनी नदीला येऊन मिळणा-या नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधा-यावर धुणीभांडी करायला गेल्या होत्या.

ठळक मुद्देनाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केली शिंदे कुटुंबातील महिला, मुली धुणीभांडी करण्यासाठी बंधा-यावर गेल्या होत्या

नाशिक : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेळगाव ढगा शिवारात असलेल्य बंधाऱ्यात बुडून एकाच कुटुंबातील मायलेकींसह सूनेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरूवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास धुणीभांडी करण्यासाठी शिंदे कुटुंबातील महिला, मुली येथील बंधा-यावर गेल्या होत्या. त्या दरम्यान, एकमेकींना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघींनाही आपले प्राण गमवावे लागले. शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या हृदयद्रावक घटनेने संपुर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेळगाव ढगा सहावा मैल शिवारातील महालक्ष्मीनगर येथे अरुण शिंदे हे कुटुंबासमवेत राहतात. त्यांच्या पत्नी मनीषा शिंदे (४२), रुतुजा अरुण शिंदे (१६), वृषाली अरुण शिंदे (२१) व अरुण शिंदे यांच्या मोठ्या भावाचा मुलगा नीलेशची पत्नी आरती शिंदे (२१) या चौघी येथील नंदीनी नदीला येऊन मिळणा-या नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधा-यावर धुणीभांडी करायला गेल्या होत्या. यावेळी चौघींपैकी एकीचा पाय घसरुन पाण्यात पडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून एकमेकींना वाचविण्यासाठी एकापाठोपाठ पाण्यात उतरलेल्या या चौघींनाही पाण्याचा अंदाज न आल्याने नाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातपूर पोलिसांनी केली आहे. रुतुजा शहरातील व्ही.एन.नाईक महाविद्यालयात वाणिज्य शाखेत इयत्ता ११वीला शिक्षण घेत होती तर वृषाली ही केटीएचएम महाविद्यालयात विज्ञान शाखेत पदवीच्या द्वितीय वर्गात शिकत होती. घटनेची माहिती मिळताच बेळगाव ढगा गावातील स्थानिक तरुणांनी बंधा-याच्या दिशेने धाव घेतली. तसेच पोलीस व अग्निशामक दलाला माहिती कळविण्यात आली. सातपूर पोलीस ठाण्याचे पथक व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी बंधाºयात उतरुन चौघींनाही पाण्यातून बाहेर काढले होते. चौघींनाही तत्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता वैद्यकिय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले.

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरAccidentअपघात