आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

By Admin | Updated: March 2, 2015 01:32 IST2015-03-02T01:32:37+5:302015-03-02T01:32:37+5:30

गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. या आजाराने राज्यात झालेले मृत्यू आणि रुग्णांची वाढती संख्या हे आरोग्य विभागाच्या

The health ministry should resign | आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. या आजाराने राज्यात झालेले मृत्यू आणि रुग्णांची वाढती संख्या हे आरोग्य विभागाच्या यंत्रणेचे मोठे अपयश असल्याने बेजबाबदार अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे आणि आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
राज्यात सर्वत्रच स्वाईन फ्लूचा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांत यातून झालेल्या मृत्यूंची संख्या पाहता लोकांत भीतीचे वातावरण आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक औषधींचा आणि लसींचा तुटवडा जाणवत आहे. शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातून रूग्णांना योग्य तो सल्ला मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तरीही आरोग्य विभागाचे अधिकारी याबाबत गंभीर नाही. त्यांची निष्क्रियता यातून समोर आली असल्याचे विखे म्हणाले. स्वाईन फ्लूचे गांभीर्य लक्षात घेऊन या विभागातील संचालक, उपसंचालकांनी अद्याप कुठेही दौरे केलेले नाहीत. या आजारासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या संदर्भातही त्यांनी माहिती जाणून घेतली नाही. यामुळेच स्वाईन फ्लूच्या आजाराची नेमकी वस्तुस्थिती समोर येऊ शकलेली नाही असे, विखे म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: The health ministry should resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.