शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

CoronaVirus Lockdown News: ...तेव्हा लॉकडाऊनचा विचार करू; आरोग्य मंत्र्यांनी सांगितली मोठ्या निर्णयाची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 15:09 IST

CoronaVirus Lockdown News: गर्दीच्या ठिकाणी निर्बंध आणखी कठोर करण्याचा विचार; आरोग्यनमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं होणारी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला लॉकडाऊनच्या उपाययोजना करण्याचे दिलेले आदेश, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा लॉकडाऊनला असलेला विरोध या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. लॉकडाऊन कोणालाही आवडत नाही. पण तहान लागल्यावर विहीर खणायची नाही. त्यामुळेच लॉकडाऊनची पूर्वतयारी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्याचं त्यांनी सांगितलं. (health minister rajesh tope on rising corona cases and lockdown preparation)"लॉकडाऊन पर्याय होऊ शकत नाही", भाजपपाठोपाठ आता राष्ट्रवादीचाही लॉकडाऊनला विरोध!दोन दिवसांपासून राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्याचे आदेशदेखील दिले आहेत. याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली. 'गेल्या वर्षी लॉकडाऊन केल्यावर स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल झाले. तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पूर्वतयारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल. लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला तरी त्याचं स्वरुप गेल्या लॉकडाऊनसारखं नसेल. कठोर लॉकडाऊन केला जाणार नाही,' असं टोपेंनी सांगितलं.'मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन म्हणताच द्राक्षांचा दर 50 रुपयांवरुन 25 वर आला'लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेल्यास तो नेमका कधी घेतला जाणार, असा प्रश्न टोपेंनी विचारण्यात आला. त्यावर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचं उत्तर आरोग्यमंत्र्यांनी दिलं. 'दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यास, पुढील काही दिवसांत आरोग्य सुविधा, बेड्स कमी पडतील, अशी परिस्थिती निर्माण झाल्यावरच लॉकडाऊनचा विचार होऊ शकतो. आयसीयू, ऑक्सिजन बेड्स कमी पडतील, अशी शक्यता निर्माण झाल्यावरच याबद्दलचा निर्णय घेतला जाईल,' असं टोपे म्हणाले.राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी कालच लॉकडाऊन उपाय नसल्याचं म्हणत विरोध दर्शवला. त्यावर मंत्रिमंडळातून विरोध होत असला तरी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात, असं टोपे म्हणाले. अर्थकारणाला धक्का लागणार नाही आणि नागरिकांचं आरोग्यदेखील जपलं जाईल अशा अनुषंगानं सुवर्णमध्य काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी नियम पाळले, तर लॉकडाऊनची गरजदेखील भासणार नाही. सध्या गर्दीच्या ठिकाणी निर्बंध आणखी कठोर करण्यावर भर देण्याचा विचार सुरू आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnawab malikनवाब मलिकUddhav Thackerayउद्धव ठाकरे