शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

थोडीशी रिस्क घेतली अन् पठ्ठ्यानं एका एकरात 10 लाखांचं उत्पन्न कमावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 17:28 IST

दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील केजच्या धनराज भुसारेनं पारंपरिक शेतीला फाटा देत औषधी वनस्पतीची शेती केली.

ठळक मुद्दे दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील केजच्या धनराज भुसारेनं पारंपरिक शेतीला फाटा देत औषधी वनस्पतीची शेती केली. पुण्यातील एका खासगी कंपनीने भुसारे यांना शतावरीचे पीक घेण्यासाठी प्रेरित केलं. भुसारे पारंपरिक शेती करत होते

बीड - कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो, वाचतो आणि पाहतोही. मात्र, शेतीचं योग्य नियोजन केल्यास, शेतात पिक लावण्यापासून ते त्याच्या उत्पन्नापर्यंत शास्त्रशुद्ध आणि आधुनिक माहितीच्या आधारे शेती केल्यास, ही काळी आई नक्कीच आपल्या बळीराजाला जगवते. शेतकऱ्याचा संसार सुखाने फुलवते. बीडमधील एका शेतकरीपुत्राने अशीच डोक्यॅलिटीने शेती करत भरगोस उत्पन्न मिळवले आहे. 

दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील केजच्या धनराज भुसारेनं पारंपरिक शेतीला फाटा देत औषधी वनस्पतीची शेती केली. कित्येकांच्या विरोधाला झुगारुन नवीन प्रयोग करण्याच्या हेतुने धनराजने विश्वास पेरून आत्मविश्वास उगविण्याचं काम केलंय. या प्रयोगशील शेतकऱ्याने कापूस, सोयाबीन या नेहमीच्या पिकांऐवजी शतावरीचं पीक घेतलं. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर केवळ 18 महिन्यात तब्बल 10 लाख रुपयांचं उत्पन्नही धनराजनं मिळवलं. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ हे दुष्टचक्र या भागाने पाहिलंय. येथील मातीनंही अनेकदा पावसाअभावी दुष्काळ झेललाय. मात्र, याच मातीत शतावरीची पेरणी करुन धनराजनं सोनं उगविण्याची किमया करुन दाखवलीय. 

केज तालुक्यातील धनराज भुसारे यांनी एक एकर शेतात शतावरीचं पीक घेतलं. शतावरी ही औषधी वनस्पती असून मागणी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे यातून चांगलं उत्पन्न मिळतं, असे धनराज भुसारे यांना समजले. त्यांनी एका खासगी कंपनीशी करार करुन शतावरीची लागवड केली. 18 महिन्यानंतर आता त्यांचं पीक काढणीला आलं आहे. शतावरी पिकातून त्यांना अठरा महिन्यात तब्बल दहा लाख रुपयांचं उत्पन्न हाती आलं आहे. 

पुण्यातील एका खासगी कंपनीने भुसारे यांना शतावरीचे पीक घेण्यासाठी प्रेरित केलं. भुसारे पारंपरिक शेती करत होते. मात्र, अशातच त्यांनी शतावरी लागवडीची माहिती घेऊन, नियोजन केलं. अठरा महिन्यानंतर पीक पूर्ण झालं असून अॅग्रो कंपनीने शतावरीचा हा एक एकराचा फड खरेदी केला आहे. जेसीबीच्या सहाय्याने हे पीक मुळापासून काढण्यात येतं. 

माहितीचा अभाव, नवतंत्रज्ञानाची निवड न करणे आणि रिस्क घेण्याची तयारी नसल्यानेच शेतकरी बांधवांना पारंपरिक पिकांना घेऊन शेती करावी. अर्थातच, मान्सून आणि पाणी हे दोन्ही घटक शेतीसाठी महत्त्वाचे ठरतातच. मात्र, तरीही काळानुसार माणसाने शेतीत, शेतीपिकात आणि शेतीच्या मशागतीतही बदल करायला हवा. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत, नवनवीन प्रयोग करत मातीशी जोडलेलं नातं बळीराजाच्या कुटुंबात समृद्धी आणेल हे मात्र ज्ञानेश्वर भुसारे यांनी घेतलेल्या जोखिमीवरुन दिसून येतंय.  

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडPuneपुणे