शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘त्यांनी’ सोडलं गाव कामासाठी : ‘यांनी’ शोधलं पोटापाण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:54 IST

स्थलांतरितांच्या गावात विहिरी खोदून कर्नाटकातील कुटुंब भरताहेत पोट

ठळक मुद्देमाळशिरस तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील शेतमजूर तात्पुरते दुसरीकडे स्थलांतरित झालेशेतकरी पाण्याच्या शोधात विहिरींची खोदाई करून शेतीची व स्वत:ची तहान भागविण्यासाठी प्रयत्न करत आहेतपोटापाण्याच्या शोधासाठी कर्नाटकातून आलेल्या अनेक कुटुंबांनी कामातून आधार शोधला

एल. डी. वाघमोडे

माळशिरस : तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील शेतमजूर तात्पुरते दुसरीकडे स्थलांतरित झाले आहेत़ शेतकरी पाण्याच्या शोधात विहिरींची खोदाई करून शेतीची व स्वत:ची तहान भागविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काहींनी गाव सोडलं असलं तरी याच स्थलांतरितांच्या गावामध्ये पोटापाण्याच्या शोधासाठी कर्नाटकातून आलेल्या अनेक कुटुंबांनी कामातून आधार शोधला आहे. 

दिवाळी संपताच कर्नाटकातील ही कुटुंबं पाण्याचे स्रोत असणाºया भागांमध्ये भ्रमंती सुरू करतात. शहराच्या बाजूला मैदानामध्ये हे उतरतात़ आपण विहिरी खोदायचे काम करत असल्याचे फलक लावून जाहिरात करतात़ त्यानुसार आसपासचे शेतकरी त्यांना येऊन भेटतात़ शेतकरी आणि त्यांच्यात करार होतो़ त्यानंतर हे कुटुंब प्रत्यक्ष विहीर खोदायच्या कामाला सुरुवात करते़ सुरेश राठोड यांचे कुटुंब कुडगीतांडा (ता. बसवनबागेवाडी, जि़ विजयपूर) माळशिरस तालुक्यात दाखल झाले आहे़ त्यांची पत्नी कांताबाई, पाचवीतून शाळा सोडून आलेली १४ वर्षांची मुलगी आक्रोना तर सहावीतून शाळा सोडून आलेला चंद्रशेखर हा मुलगा, भाऊ महादेव राठोड, त्याची पत्नी शारूबाई राठोड आणि त्यांची दोन लहान मुले असे हे कुटुंब सध्या भांबुर्डी परिसरात विहीर खोदायचे काम करीत आहे.

यातील महिला कांताबाई स्वत: क्रेन चालवतात तर त्यांची मुले क्रेन बाजूला ढकलणे आणि विहिरीत खोदलेले दगडगोटे वर भराव्यावर व्यवस्थित ठेवण्याचे काम करतात़ दिवाळीपासून जून महिन्यापर्यंत या परिसरात १० ते १५ विहिरींची खोदाई करतात. 

असा होतो करार- प्रथमत: विहिरीची पाहणी करतात, त्यानंतर त्या विहिरीतील खडकांच्या थराचा अंदाज घेऊन विहिरीची लांबी व रुंदी यानुसार प्रति फुटाला आठ ते दहा हजार रक्कम घेण्याचा करार केला जातो़ यामध्ये काम सुरू असताना विहिरीत येणारे पाणी विहिरीबाहेर टाकणे आवश्यकता असल्यास खडकांना ब्लास्टिंगच्या साह्याने फोडणे आदी गोष्टींचा समावेश असतो़ यात कुटुंबातील प्रत्येक महिला क्रेन अगदी सफाईने चालवतात तर पुरुष मंडळी विहिरीतील दगडगोटे भरून क्रेनद्वारे वर पाठवतात.

व्यवसाय म्हणून आम्ही क्रेनद्वारे विहिरी खोदायचं काम करतो़ पूर्ण हंगामात आठ ते दहा लाखांपर्यंत पैसे मिळतात, मात्र त्यामधून खर्च वजा जाता दोन लाखांपर्यंत नफा आम्हाला मिळतो़ त्यानंतर पाऊस पडला की गावाकडे जाऊन शेतीतील कामांना सुरुवात करतो़ - सुरेश राठोड, कुटुंबप्रमुख, कर्नाटक

सध्या विहिरीची खोदाई सुरू केली आहे़ किमान पिण्यासाठी तरी पाणी उपलब्ध होईल व भविष्यात पाऊस पडल्यानंतर शेतीला या पाण्याचा चांगला उपयोग होईल़ या हेतूने खोदाई केली जात आहे.- दत्तात्रय नरळे, शेतकरी, भांबुर्डी

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायdroughtदुष्काळWaterपाणीTemperatureतापमानKarnatakकर्नाटक