शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

उल्हास, वैतरणा, सूर्या, तानसा, वसिष्ठी नद्यांची प्रदूषण पातळी धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 04:21 IST

महाराष्ट्रातील बहुतेक नद्यांतील प्रदूषण धोकादायक स्तरावर आहे, असे जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी लोकसभेत सांगितले.

 - नितीन अग्रवालनवी दिल्ली : महाराष्ट्रातील बहुतेक नद्यांतील प्रदूषण धोकादायक स्तरावर आहे, असे जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी लोकसभेत सांगितले. ते म्हणाले, देशातील ३२३ नद्यांमध्ये एकूण ३५१ भागांत प्रदूषण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात ५३ नद्या महाराष्ट्रातील आहेत. त्यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमधील सावित्री, सूर्या, तानसा, उल्हास, वैतरणा आणि वसिष्ठी या नद्यांचा समावेश आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडील ताज्या आकडेवारीचा हवाला देऊन कटारिया यांनी सांगितले की, महाराष्ट्रात गोदावरी, काळू, कुंडलिका, मिठी, मोरना, मुळा, मुठा नीरा, वेल, भीमा, इंद्रायणी, पवना, वैनगंगा, वर्धा आणि घोड यांचा समावेश आहे. याशिवाय कन्हान, कोलार, कृष्णा, मोर, पाताळगंगा, पेठी, पैनगंगा, पूर्णा, तापी, उरमोडी, वेण्णा, वाघूर, बिंदूसरा, बोरी, चंद्रभागा, दारणा, गिरणा, हिवरा, कोयना, पेहलार, सीना, तितूर, अंबा, भातसा, गोमई, कान, मंजिरा, पंचगंगा, पंजारा, रंगावली या नद्याही कमालीच्या प्रदूषित आहेत.एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना कटारिया म्हणाले की, राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्ड प्रदूषण निगरानी समित्यांसोबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड (सीपीसीबी) निगरानी केंद्रांच्या नेटवर्कच्या माध्यमातून नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता तपासत असते. सीपीसीबीच्या अहवालात पाण्यात जैव रासायनिक आॅक्सिजनच्या पातळीच्या आधारावर नद्यांमध्ये किती प्रदूषण आहे हे ठरते.उपाययोजना सुरूनमामि गंगे, राष्ट्रीय नदी संरक्षण योजना, अटल नविनीकरण आणि शहरी परिवर्तन मिशन (अमृत), राष्ट्रीय जलीय पारिस्थिती प्रणालीच्या संरक्षण योजनेअंतर्गत (एनपीसीए) केंद्र सरकारकडून राज्य आणि शहरी शाखेला मदत दिली जाते.कटारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रदूषित नदी खंड आसाम (४४), मध्य प्रदेश (२२), केरळ (२१), गुजरात (२०), ओडिशा (१९) आणि पश्चिम बंगालमध्ये (१७) आहेत.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण