शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

तुम्ही लिहायला, वाचायला शिकलात ना, ते काँग्रेस पक्षाचं देणं; सुळेंचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 08:40 IST

सर्वसामान्य मायबाप जनतेला या सरकारमध्ये काहीही मिळालेलं नाही त्यामुळे या सरकारच्या विरोधात आपल्याला मोठी लढाई लढाईची आहे असं त्यांनी सांगितले. 

पुणे - Supriya Sule on BJP ( Marathi News ) एका बाजूला काँग्रेस आणि एका बाजूला भारतीय जनता पक्ष. पुण्यामध्ये वीज कोणी आणली ? शाळा कोणी आणल्यात ? हॉस्पिटल कोणी आणलं ? कारखाने कोणी काढलेत ? आयटी कोणी आणली ? पुण्यामध्ये सर्व मोठे ब्रिज कोणी बांधले ? रस्ते मोठे कोणी केले ? फोन कोणी आणलेत ? व्हाट्सअप कोणी आणलं ? इंस्टाग्राम कोणी आणलं ? बँका कोणी काढल्यात ? हे सर्व काँग्रेस पक्षाने केलं. संसदेत आम्हाला जे सुनावतात ना त्यांना मी सांगते की, तुम्ही जे लिहायला, वाचायला शिकलात ना ते काँग्रेस पक्षाचे देणे आहे म्हणून तुम्ही शिकलेला आहात अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर निशाणा साधला. 

पुण्यात झालेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेत त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या की, सरकार जर सर्वच गोष्टी प्रायव्हेट कंपन्यांना देणार असेल, तर आम्ही टॅक्स कशासाठी भरायचा ? हे सर्व जे बोलतात ना, आम्ही विकास करतो, विकास करतो ते कोणाच्या पैशांनी करतात तुमच्या घरातून ते पैसे येत नाही. आम्ही टॅक्स भरतो. आम्ही जीएसटी भरतो त्यामुळे हा विकास होतो या सरकारला पॉलिसी पॅरालिसीस झालेला आहे. सर्वसामान्य मायबाप जनतेला या सरकारमध्ये काहीही मिळालेलं नाही त्यामुळे या सरकारच्या विरोधात आपल्याला मोठी लढाई लढाईची आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी राजकारणात कशासाठी आली तर तुमच्या जीवनात एक वेगळा बदल घडवण्यासाठी आली आहे आणि तीन गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही सर्वांनी काम केले पाहिजे. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान; सेवा मायबाप जनतेची, सन्मान शेतकऱ्यांचा, महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा, त्यामुळे ही संघर्षाची लढाई मला भीतीदायक वाटत नाही. मी शिवछत्रपतींचे नाव घेते आणि ज्यांचे संस्कार आमच्यावर झाले ते कैलासवासी यशवंतराव चव्हाण. ते फक्त फोटो पुरतं नाही तर, आमच्या कामातूनच दिसते असा टोला सुप्रिया सुळेंनीअजित पवार गटाला लगावला. 

दरम्यान, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांचे मी आभार मानते. गेले ३ दिवस-रात्र आपण या आक्रोश मोर्चात सहभागी झालात. लोकांपर्यंत पोहोचलात. एक वेगळा आक्रोश आणि हा निरोप मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचलाय. त्यामुळे याचे सर्वात मोठे यश आणि पोचपावती म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री हे पहिल्यांदा शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहेत त्यातच आपल्याला यश मिळालेले आहे असंही सुळेंनी म्हटलं. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपाAjit Pawarअजित पवार