शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी अर्ज केलाय का?; मुदत रविवारपर्यंतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 07:15 IST

आतापर्यंत ४१ लाख अर्ज दाखल; सर्वाधिक लातूर विभागातून, सर्वात कमी कोकणातून 

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत रब्बी हंगामात विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४१ लाखांपर्यंत पोचली आहे. यातून २९ लाख ४० हजार ६८ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. योजनेत गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकांसाठी सहभागाची अंतिम मुदत १५ डिसेंबर आहे, तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठीच्या सहभागाची मुदत ३१ मार्च आहे.

 राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना उपलब्ध करून दिली. यंदाच्या रब्बी हंगामातही ही योजना सुरू असून, शेतकऱ्यांनी आतापर्यंत ४१ लाख ९ हजार ७८४ अर्ज दाखल केले आहेत. यात सर्वाधिक १३ लाख ५६ हजार ८५३ अर्ज लातूर विभागातील आहेत. त्याखालोखाल १० लाख ३६ हजार १२८ अर्ज छत्रपती संभाजीनगर विभागातून आले आहेत. सर्वांत कमी ६१ अर्ज कोकण विभागातून आले आहेत. गेल्या वर्षी या योजनेत ७१ लाख ८७ हजार १८२ अर्ज प्राप्त झाले होते.  

२९ लाख हेक्टरवरील क्षेत्र संरक्षितआतापर्यंत आलेल्या अर्जांमधून २९ लाख ४० हजार ६८ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे, तर १२ हजार ३२८ कोटी ६७ लाख रुपयांची रक्कम विमा संरक्षित करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना अर्ज करताना केवळ १ रुपया भरावा लागत असून, शेतकऱ्यांच्या आलेल्या अर्जांमधून ४१ लाख ९ हजार ५४२ रुपये जमा झाले आहेत.विमा कंपन्यांना विमा हप्त्यापोटी राज्य सरकारला ७५१ कोटी ८३ लाख रुपये, तर केंद्र सरकारला ४७७ कोटी ३६ लाख असे एकूण १ हजार २२९ कोटी ६१ लाख रुपये द्यावे लागणार आहेत.

जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत ऑनलाइनद्वारे सहभाग नोंदवावा. गेल्या वर्षी सुमारे ७१ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.- विनयकुमार आवटे, कृषी संचालक, पुणे

टॅग्स :Farmerशेतकरी