शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हासनचा नागराज देशभर सायकलवर फिरतोय; प्रत्येक राज्यात जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटतोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 10:56 IST

देशभक्ती रुजवण्यासाठी सफर : मनी विचार अखंड भारताचे !

ठळक मुद्देसमता, बंधुत्व, देशप्रेम रुजवण्यासाठी कर्नाटकी नागराज गौडा हा सायकलवरून देशाची सफर करतोयगेल्या दीड वर्षापासून तो १५ राज्यातील भ्रमंती पूर्ण करून त्यानं सोमवारी सोलापूर गाठलंया भ्रमंती सफरीत त्यानं अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत देशात एकता, अखंडता, शांती नांदावी यासाठी प्रयत्न करीत

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : जगात जिथं लोकशाही बळकट आहे... ती अधिक बळकट करण्यासाठी अर्थात अखंड भारतातील प्रत्येकामध्ये समता, बंधुत्व, देशप्रेम रुजवण्यासाठी कर्नाटकी नागराज गौडा हा सायकलवरून देशाची सफर करतोय. गेल्या दीड वर्षापासून तो १५ राज्यातील भ्रमंती पूर्ण करून त्यानं सोमवारी सोलापूर गाठलं.. या भ्रमंती सफरीत त्यानं अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत देशात एकता, अखंडता, शांती नांदावी यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितल्याची माहिती नागराज गौडा याने ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. ना लग्नाची चिंता ना घरची... केवळ मनी विचार अखंड भारताचे आले म्हणून हा अवलिया सध्या सायकलवरुन देशाची भ्रमंती करत आहे. 

या जगात कोण कशासाठी काय करेल हे सांगणे थोडं कठीणच आहे़ आतापर्यंत देशातील अनेक अवलियांनी विविध कारणासाठी वाट्टेल ते केल्याचे आपण जाणताच मात्र देशभक्तीसाठी दीड वर्षात १५ राज्यांची भ्रमंती करणाºया अवलियाने सोमवारी सोलापूर गाठलं.. कर्नाटक राज्यातील हासन येथील नागराज मल्ले गौडा असं त्याचं नाव़ याबाबत नागराज याच्याशी संवाद साधला असता तो म्हणाला की, माझे मूळगाव हासन आहे़ मी अविवाहित असून माझी घरची परिस्थिती सर्वसाधारण आहे़ माझे हासन येथे किराणा दुकान असून घरचे उर्वरित लोक हे दुकान चालवितात़ सुरुवातीपासून मला देशाबद्दल प्रेम, सर्वसामान्यांबाबत आपुलकी, गरीब, वंचित, गरजू लोकांची मदत करण्याची आवड होती. शालेय शिक्षण झाल्यानंतर देशासाठी काहीतरी करावं या उद्देशाने मी सायकल भ्रमंतीचा निर्णय घेतला़ त्यानुसार डिसेंबर २०१७ साली या भ्रमंतीला सुरुवात केली़ मुंबई येथील अंधेरी पूर्व येथून सायकल सफर सुरू केल्यानंतर दीड वर्षात १५ राज्यांचा दौरा केला़ या दौºयात देशातील अनेक सिनेस्टार कलावंत, राजकीय मंडळी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे समाजसेवक आदींची भेट घेतली़ या भेटीदरम्यान फक्त देशाच्या विविध विषयावर चर्चा केल्याचं त्या नागराजने सांगितले़

या राज्याचा केला दौरा पूर्ण- कर्नाटकच्या नागराज गौडा या अवलियाने आतापर्यंत दीड वर्षात  दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, गुजरात, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू आदी १५ राज्यांची सफर पूर्ण केली आहे़ ज्या ज्या राज्यात प्रवेश केला तेथे देशप्रेमाबद्दलचा प्रचार, प्रसार व जनजागृती केली़ राज्याराज्यातील विविध सेवाभावी संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींशी संवाद साधत देशप्रेम जागृत करण्याचे काम केल्याचे गौडा याने सांगितले़

या लोकांच्या घेतल्या गाठीभेटी- १५ राज्यांचा दौरा करीत असताना नागराज गौडा याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शीला दीक्षित, दिग्विजय सिंह, राजस्थानचे अशोक गेहलोत, उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव, मध्य प्रदेशचे कमलनाथ, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या, मध्यप्रदेशचे ज्योतिरादित्य शिंदे, दिल्लीचे मनोज तिवारी आदी मुख्यमंत्र्यांसह विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, समाजसेवक व मंदिराच्या प्रमुखांची भेट घेतल्याचे सांगितले़ 

जगात शांती नांदावी, देश सुरक्षित राहावा या उद्देशाने सायकल भ्रमंती सुरू केली आहे़ आतापर्यंत देशातील १५ राज्यांचा दौरा पूर्ण केला असून, संपूर्ण देशाची भ्रमंती करणार आहे़ सध्या पंढरपूरची आषाढी वारी असल्याची माहिती मिळाल्याने पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे़ मंगळवारी विठ्ठलाचे दर्शन घेऊन गुजरात राज्याच्या दिशेने सायकल प्रवास सुरू ठेवणार आहे़- नागराज मल्ले गौडा,सायकल भ्रमंती अवलिया, हासन (कर्नाटक)

टॅग्स :SolapurसोलापूरCyclingसायकलिंगIndiaभारतKarnatakकर्नाटक