शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दिव्यांगांना मिळणार आर्थिक मदतीचा हात : मासिक १ हजार रुपये मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 16:35 IST

निराधार आणि वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांग व्यक्तींना दरमहा १ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देकुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा केली ५० हजार या निर्णयाचा फायदा १ लाख ३५ हजार ५१२ दिव्यांग व्यक्तींना फायदा होणार

पुणे : निराधार आणि वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या अर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांग व्यक्तींना दरमहा १ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. तसेच, या योजनेसाठीच्या आर्थिक निकषात २१ हजारावरुन ५० हजार रुपये करण्यात आली आहे.     संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेतील अर्थसहाय्य वाढवावे असा प्रस्ताव राज्यसरकारकडे होता. त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेतील व्यक्तींना ४० ते ७९ टक्के अपंगत्वासाठी मासिक ८०० आणि त्यावर अपंगत्व असलेल्यांना मासिक १ हजार रुपये देण्यात येतील. या निर्णयाचा फायदा १ लाख ३५ हजार ५१२ दिव्यांग व्यक्तींना फायदा होणार आहे. या पुर्वी ४० ते ७८ अपंगत्वासाठी ६०० रुपये निवृत्तीवेतन देण्यात येत होते. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेत ८० टक्के ते त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींचा समावेश होते. केंद्र पुरस्कृत योजनेमधून लाभार्थ्यांना दरमहा दोनशे रुपये निवृत्ती वेतन दिले जाते. याच लाभार्थ्यांना राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजनेतून दरमहा ४०० रुपये निवृत्ती वेतन देण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात सहाशेवरुन १ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी ३४ कोटी १३ लाख रुपयांच्या वार्षिक खर्चास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५० हजार रुपयांपर्यंत असणाऱ्या आणि ६५ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या अस्थिव्यंग, अंध, मुकबधीर, कर्णबधीर आणि मतीमंद प्रवर्गातील व्यक्तींना राज्याच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सहाय्य केले जाते. तसेच दारिद्र रेषेखालील कुटुंबातील ६५ वर्षे व त्या पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना श्रावणबाळ सेवा निवृत्ती योजनेतून आर्थिक सहाय्य केले जाते.  --------------------------दिव्यांगांना सरसकट २ हजार रुपये दरमहा निवृत्ती वेतन द्यावे, वार्षिक उत्पन्नाची अट १ लाख करावी अशी मागणी गेल्या पाच वर्षांपासून प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, सरकारने केवळ ८०० ते १ हजार रुपये अशी वाढ केली आहे. वाढती महागाई आणि दिव्यांगांना भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार केला गेला नाही. राजेंद्र वाकचौरे, उपाध्यक्ष प्रकार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी-चिचंवड

टॅग्स :PuneपुणेApang Kalyan Aayuktalayaअपंग कल्याण आयुक्तालयGovernmentसरकार