जिल्हय़ात 1200 हेक्टरपैकी निम्म्या पेरण्यांचे नुकसान

By Admin | Updated: July 9, 2014 00:23 IST2014-07-09T00:23:51+5:302014-07-09T00:23:51+5:30

रायगड जिल्ह्यात जुलै महिन्यात आतापर्यंत जवळपास 1क्क् मि.मी. पाऊस पडला असून चारा, बियाणो आणि खतांची तूर्तास तरी टंचाई नाही.

Half of the sowing of 1200 hectares in the district is damaged | जिल्हय़ात 1200 हेक्टरपैकी निम्म्या पेरण्यांचे नुकसान

जिल्हय़ात 1200 हेक्टरपैकी निम्म्या पेरण्यांचे नुकसान

 

अलिबाग :  रायगड जिल्ह्यात जुलै महिन्यात आतापर्यंत जवळपास 1क्क् मि.मी. पाऊस पडला असून चारा, बियाणो आणि खतांची तूर्तास तरी टंचाई नाही. पावसाची आजची सरासरी अंदाजे 26 टक्के असून वार्षिक पावसाच्या प्रमाणात ही 9.5 टक्के आहे. खरीप लागवडीचे क्षेत्न जिल्ह्यात 1 लाख 41 हजार हेक्टर आहे. त्यात भाताचे क्षेत्न 1 लाख 23 हजार हेक्टर असून भात पेरणी 1क् हजार 5क्क् हेक्टर झाली आहे. एकूण संभाव्य भात लागवड 1 लाख 1क् हजार होऊन शकेल असा अंदाज आहे. तथापि अलिबाग व पेण तालुक्यातील अंदाजे सुमारे 12क्क् हेक्टरवर 5क् टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान  झाले आहे. सुमारे 12क्क् हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी सोमवारी दिली. मदत व पुनर्वसन मंत्नी डॉ.पतंगराव कदम व सचिव मिलिंद म्हैसकर यांनी व्हिडीओ कॉन्फरिसंगद्वारा घेतलेल्या आढावा बैठकीत भांगे यांनी ही माहिती दिली.
मदत व पुनर्वसन मंत्नी डॉ.पतंगराव कदम व सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सोमवारी सकाळी मंत्नालयातून राज्यातील महसूल आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून टंचाईस्थिती, पाणी, रोहयो आणि मदत पुनर्वसन संदर्भात आढावा घेऊन सुचना दिल्या.
काही भाग वगळता दुबार पेरणीची आवश्यकता भासणार नाही 
जिल्ह्यात बियाणोबाबत टंचाई नाही. बियाण्यांची मागणी 17 हजार 2क्क् क्विंटल असून 18 हजार क्विंटल बियाणो उपलब्ध झाले आहे. जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे काही भाग वगळता दुबार पेरणीची आवश्यकता भासणार नाही असा कृषी विभागाचा अंदाज आहे. खतांच्या बाबतही जून अखेरपर्यंत 95क्क् मे.टन. ची गरज होती प्रत्यक्षात 75क्क् मे.टन. खत उपलब्ध करु न देण्यात आले.
विविध बँकांमार्फत 64 कोटी पीक कर्जाचे वाटप 
खरीप पेरणीसाठी शेतक:यांना आतापर्यंत विविध बँकांमार्फत 64 कोटी पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्याचे एकूण उद्दीष्ट 121 कोटीचे असून जून अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांनी चांगली मेहनत घेऊन 5क् टक्के पेक्षा अधिक कर्जवाटप केले आहे. उर्वरित उद्दीष्टपूर्तीसाठी तालुका व सर्कल क्षेत्नात शिबिराचे आयोजन करुन शेतक:यांना कर्ज उपलब्ध करु न द्यावे असेही आवाहन केले असल्याची माहिती भांगे यांनी दिली.  (विशेष प्रतिनिधी)
 
जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा
4जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांमध्ये जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा आहे. नागरी व ग्रामीण तसेच औद्योगिक क्षेत्नामध्ये पाणी वापर जपून करा असे आवाहनही करण्यात आले आहे. तथापि जिल्ह्यात सध्या 55वाडय़ा व 36 गावे अशा 91 ठिकाणी 14 टॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. चा:याच्याबाबतही टंचाई नसून जिल्ह्यातील 6 लाख 62 हजार पशुधनासाठी आवश्यक चा:याची वार्षिक मागणी 1 लाख 25 हजार मे.टन. आहे. तर उपलब्ध चारा साठा 1 लाख 57 हजार आहे. मनरेगा अंतर्गत 1क्9 कामे जिल्ह्यात सुरू असून या कामावर 2 हजार 373 मजुरांची उपस्थिती आहे.

 

Web Title: Half of the sowing of 1200 hectares in the district is damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.