शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडवा : फॅशनच्या युगातही मराठमोळ्या परंपरा टिकवून ठेवणारा सण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 07:36 IST

 वसंत ऋतूतील चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, हाच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस होय. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. गुढीपाडवा या सणाला एक आगळ मराठमोळपण आहे ते महाराष्ट्रीयन संस्कृतीमुळे! चैत्र महिन्यात सभोवतालच्या निसर्गात बदल होऊ लागतात.

 वसंत ऋतूतील चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, हाच हिंदू नववर्षाचा पहिला दिवस होय. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. गुढीपाडवा या सणाला एक आगळ मराठमोळपण आहे ते महाराष्ट्रीयन संस्कृतीमुळे! चैत्र महिन्यात सभोवतालच्या निसर्गात बदल होऊ लागतात. वसंत ऋतूची चाहूल लागते आणि शुष्क झालेली सृष्टी चैत्राच्या नव पालवीने फुलून जाते. निसर्गातील त्या परिवर्तनाचे, नवचैतन्याचे स्वागत करण्याचा उद्देश दारी गुढी उभारण्यामागे दिसून येतो. 

        गुढीपाडवा ह्या सणाबाबत वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. ब्रम्हदेवाने हे विश्व निर्माण केले ती चैत्र शुद्ध प्रतिपदेची सकाळ मानतात. तसेच याच दिवशी श्रीरामचंद्र चौदा वर्षांच्या वनवासानंतर रावणाचा वध करून अयोध्येत परत आले असेही मानले जाते. त्या वेळी घरांना तोरणे लावून, गुढ्या उभारून आनंद साजरा केला. म्हणून आजही लोक गुढ्या उभारून तो दिवस साजरा करतात. गुढीला धर्मशास्त्रात ‘ब्रम्हध्वज’ असे म्हणतात. ‘ब्रह्म’ हा शब्द बृह म्हणजे वाढणे!           गुढीला कडुलिंबाची डहाळी लावली जाते त्यामागे शास्त्रीय कारण आहे कि ते एक उत्तम कीटकनाशकही आहे. पाडव्याला पंचांग पूजन व वाचन करतात गुढीपाडव्याला काही धार्मिक विधी पार पाडले जातात. त्यात ब्रम्हपूजा हा महत्वाचा विधी असतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने त्या दिवशी नवीन कामे,संकल्प यांचा प्रारंभ केला जातो.                     महाराष्ट्रात आगरी-कोळी, ब्राह्मण, मराठा, आदिवासी अश्या अनेक समाजात वेगवेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा सण पारंपारिक साजरा केला जातो. गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत काळानुसार बदलत गेली आहे. मात्र तरीही पालघर, मुंबई, ठाणे येथे अनेक ठीकाणी  पारंपरिक पोषांखात स्त्री-पुरुष आनंदाने स्वागत यात्रेत सहभागी होतात.                 आगरी-कोळी समाजात नव विवाहित वधू तर होळी सणानंतर येणाऱ्या पाडव्याची आतुरतेने वात बघत असतात. आगरी, ब्राह्मण समाजात नववारी म्हणजे संस्कृतीच प्रतिक. जरिचं लुघडं तर प्रत्येक स्त्रीचा जीव कि प्राणचं! आणि पैठणीचा रुबाब तर काही औरच!!  नववारी-पैठणी नेसलेल्या स्त्रियां, त्यांच्या नाकातील चमकणारी आकर्षक सोन्याची नथ, कानातले कर्णफुलं, गळ्यातील लक्ष्मीहार, मंगळसूत्र, मोत्यांचा सर, सोन्याचे बाजूबंध, हिरेजडीत बांगड्या,कमरपट्टा, अर्धचंद्रकोर टिकली, हळद कुंकू, चांदीचे पैंजण, केसांचा पारंपारिक अंबाडा त्यातून डोकावणारे सुवर्णफुल.. आणि रुळणारे गजरे.!! सांर अद्वितीय.. अगदी डोळ्याचं पारण फेडणार निखळ, सोज्वल सौंदर्य आणि ह्या साऱ्यांनाच कवेत घेऊ पाहणारी बाहू-खांद्यावरची रेशीम शाल.!! साक्षात लक्ष्मीचं...!!

          त्या दिवशी पहाटे घरातील सर्व माणसे तैलाभ्यंग करून गरम पाण्याने स्नान करतात. नंतर कडुलिंबाची पाने भक्षण करतात. मुख्यत्वे वसई विरार आणि कोकणातील आगरी, ब्राह्मण समाजात आजही  गावांमध्ये अंगण शेणाने सारवून रांगोळ्या काढल्या जातात. त्यांनंतर गुढी उभारण्याची जागा स्वच्छ केली जाते. स्वच्छ धुतलेल्या नवीन बांबूला रंगीत नववारी, साडी, रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी, फुलांचा हार व गठमाळ (साखरेची गाठ) बांधतात. आणि त्यावर तांब्या,गडू उलथ ठेवला जातो. काठीला कुंकू, गंध, अक्षता,फुलांच्या माळा लावतात. अशी तयार झालेली गुढी डौलाने उभी करतात. परंपरेप्रमाणे गुढीची पूजा करून तिला वरण, पुरण पोळी, श्रीखंड, दूध-साखर,पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवला जातो. निरंजन आणि उदबत्ती लावली जाते.     ब्रम्हध्वज नमस्तेsतु सर्वाभिष्ट फलप्रद      प्राप्तेस्मिन संवत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु

म्हणत गुढीची पूजा केली जाते. आणि  संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी नैवेद्य दाखवून ती विधीपूर्वक उतरवण्याची येथे पद्धत आहे!            अशी ही ग्रामीण भागातील गुढीपाडव्याची परंपरा फॅशनच्या युगातही टिकून आहे हेच महत्वाचे!!      

टॅग्स :Gudi Padwa 2018गुढीपाडवा २०१८gudhi padwaगुढी पाडवाMaharashtraमहाराष्ट्रcultureसांस्कृतिक