शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घ्यावा : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 15:39 IST

प्रत्येक पालकमंत्र्यांना दुष्काळग्रस्त भागात भेटी देऊन प्रत्यक्ष आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई : नक्षली हल्ला, दुष्काळी उपाययोजनांसाठी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलविली होती. यावेळी काल नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 15 जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्पण करण्यात आली. तसेच, राज्यातील दुष्काळी स्थितीचा, राज्य सरकारतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या मदतीचा सविस्तर आढावा घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.   

राज्यातील 12,116 गावांमध्ये 4774 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 2016 मध्ये याच सुमारास 9579 गावांमध्ये 4640 टँकर्स लागले होते. सुमारे 8.5 लाख पशुधनासाठी 1264 चारा छावण्या लावण्यात आल्या आहेत. एकूण 82 लाख शेतकर्‍यांपैकी 68 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात आतापर्यंत 4412.57 कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्यावतीने दुष्काळ निवारणासाठी 4714.28 कोटी रूपये मदत देण्यात आली असून, राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात 3400 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. सुमारे 3200 कोटी रूपये पीकविम्याच्या मदतीपोटी सुद्धा देण्यात येत असून, त्यापैकी 1100 कोटींचे वाटप पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

याशिवाय, प्रत्येक पालकमंत्र्यांना दुष्काळग्रस्त भागात भेटी देऊन प्रत्यक्ष आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चारा छावण्यांना भेटी देणे, टँकर्सची स्थिती पाहणे इत्यादींचा आढावा घेण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. स्थलांतर रोखण्यासाठी सुद्धा उपाय हाती घेण्यात आले असून, रोजगार मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मान्सूनच्या अंदाजाचा सुद्धा यावेळी आढावा घेतला. पाऊस थोडा विलंबाने आल्यास करावयाच्या उपाययोजनांचा सुद्धा यावेळी आढावा घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रGadchiroliगडचिरोली