शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळणार : तावडे

By admin | Updated: December 2, 2014 00:24 IST

४ डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार होईल. त्यामध्ये आठ ते दहा मंत्र्यांचा समावेश असेल.

कणकवली : ४ डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार होईल. त्यामध्ये आठ ते दहा मंत्र्यांचा समावेश असेल. त्यानंतर हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याला पालकमंत्री मिळेल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग दौऱ्यात त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर सर्व खातेप्रमुखांची बैठक घेतली. पुढील कार्यक्रमाचे निमित्त सांगत अवघ्या १३ मिनिटांत आढावा बैठक आटोपली. मंत्रीपद मिळाल्यानंतर शिक्षणमंत्री तावडे यांचा हा पहिलाच सिंधुदुर्ग दौरा होता. संस्था प्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर तावडे यांनी दुपारी जिल्ह्यातील खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील अशासकीय समिती पदांवरील नेमणुका रद्द करण्याचे आदेश तावडे यांनी दिले. कुठल्याही पक्षाचे समिती सदस्य असले तरी सर्व समित्यांच्या अशासकीय पदांवर फेर नेमणुका केल्या जातील, असे ते म्हणाले. रायगड जिल्ह्यातील रिक्त पदांचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याकडून अद्याप रिक्त पदांचा अहवाल राज्याकडे मिळालेला नाही, तो तातडीने पाठवून द्यावा, असे आदेश तावडे यांनी दिले. तंत्रशिक्षण संस्थामधील रिक्त पदांचा अहवालही तातडीने द्या, असे तावडे म्हणाले. जिल्ह्याच्या विकास आराखड्यासंदर्भात तावडे यांनी प्रश्न उपस्थित केला. जिल्ह्याचा ७३ कोटी, १०० कोटी आणि १२० कोटी असा तीन प्रकारे आराखडा तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तारामुंबरी पूल, आनंदवाडी पूल रखडल्याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली. जनहिताच्या कामांना प्राधान्य द्यानारायण राणे यांच्यावर रोख ठेवत तावडे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, यापूर्वीच्या पालकमंत्र्यांनी केलेल्या कमिटमेंटचा विचार करू नका. जिल्ह्याच्या ठराविक भागाला प्राधान्य न देता. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करण्याचा आपला प्रयत्न आहे. शिक्षणमंत्री तावडे हे शासकीय विश्रामगृहातून बाहेर पडत असतानाच शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी विश्रामगृहाबाहेर त्यांची भेट घेतली. भाजपाच्या सरकारबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. परंतु, हे सरकार पाच वर्षे स्थिर राहीलच आणि पुन्हा हेच सरकार येईल. अमूक एका पक्षाच्या जीवावर भाजपाच्या सरकारची स्थिरता अवलंबून नाही. मी जे होणार आहे तेच बोलतो आणि जे बोलतो ते करतो, असे विनोद तावडे म्हणाले. मंत्री झाल्यानंतर राज्यात हा पहिलाच सत्कार होत आहे. फक्त सत्कारासाठी कुठेही जायचे नाही, असे आम्ही मंत्र्यांनी ठरवले आहे. कोणताही उपक्रम असेल तर आम्ही येऊ. (प्रतिनिधी)