शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 05:42 IST

राज्यात कोरोनाचे ७४,८६० रुग्ण : आतापर्यंत २,५८७ बळी; दिवसभरात २ हजार ५६० रुग्ण, तर १२२ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात १ मे ते १ जून कालावधीत राज्यातील रुग्णवाढीचा वेग क्रमश: कमी होत असून १ जून रोजी तो देशाच्या सरासरीपेक्षा ४.७४ टक्केदेखील कमी झालेला आहे, हे स्पष्ट झाले आहे. यावरून राज्यातील कोविड-१९ प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आता राज्यात रुग्णवाढीचा दर ७ वरून ४.१५ टक्क्यांवर आल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.

राज्यात बुधवारी दिवसभरात कोरोनाच्या २ हजार ५६० रुग्णांची तर १२२ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ३९ हजार ९३५ अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७४ हजार ८६० झाली असून मृतांचा आकडा २ हजार ५८७ झाले आहेत. दिवसभरात ९९६ रुग्ण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३२ हजार ३२९ आहे.

राज्यात नोंद झालेल्या १२२ मृत्यूंमध्ये मुंबई ४९, उल्हासनगर ३, नवी मुंबई ३, ठाणे २, मीरा भार्इंदर १, वसईविरार १, भिवंडी १, धुळे ४, जळगाव २, अहमदनगर १, नंदुरबार १, पुणे १९, सोलापूर १०, कोल्हापूर २, औरंगाबाद मनपा १६, जालना १, उस्मानाबाद १, अकोला २ आणि उत्तर प्रदेश, बिहार व प. बंगाल येथील प्रत्येकी एका स्थलांतरित व्यक्तीचा समावेश आहे. १२२ मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ५१ महिला आहेत. यात ६९ रुग्ण ६०पेक्षा अधिक वयोगटातील आहेत. तर ४६ रुग्ण ४० ते ५९ वयोगटातील आहेत. तर सात जण ४० वर्षांखालील आहे. या १२२ रुग्णांपैकी ८८ जणांमध्ये ७२ टक्के अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.१८ टक्के आहे, तर मृत्यूदर ३.४५ टक्के आहे. सध्या राज्यात ५ लाख ७१ हजार ९१५ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाइन सुविधांमध्ये ७१ हजार ९१२ खाटा उपलब्ध असून ३३ हजार ६७४ लोक अलगीकरणात आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस