शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

नवरात्रौत्सवात जालना बाजारपेठेत तेजीची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:04 PM

बाजारगप्पा : पितृ पंधरवडा संपून आता नवरात्रौत्सवारस परंपरागत पद्धतीने उत्साहाने सुरुवात झाली आहे.

- संजय देशमुख (जालना)

पितृ पंधरवडा संपून आता नवरात्रौत्सवारस परंपरागत पद्धतीने उत्साहाने सुरुवात झाली आहे. सोयाबीनची काढणी पूर्ण झाली असून, अडत व्यापाऱ्यांना आता सोयाबीन बाजारात केव्हा दाखल होते, याची प्रतीक्षा लागली आहे. नवरात्रौत्सवात अनेक शेतकरी दसरा, दिवाळीनिमित्त सोयाबीन बाजारात आणतात. सध्या जालना बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढली असून, ती जवळपास ५ हजार पोती एवढी आहे. नवरात्रामुळे उपवासाच्या पदार्थांची मागणी लक्षात घेता, घाऊक बाजारपेठेत शेंगदाणे ६ ते ८ हजार क्विंटलवर पोहोचले असून, त्यात आणखी ५०० ते ७०० रुपयांची वाढ अपेक्षित आहे.

महिन्या, दोन महिन्यांपासून जालना बाजारपेठेत सर्वकाही शांत शांत सुरू आहे. पावसाने हुलकावणी दिल्याचा परिणामही बाजारपेठेवर दिसून येत आहे. रबी हंगामात प्रामुख्याने शाळू, ज्वारी आणि हरभरा, तसेच गव्हाची पेरणी केली जाते. मात्र, घटस्थापना झाल्यावरही अद्याप या पेरणीला प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे रबी हंगामातील पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पावसाने आता पूर्णपणे परतीचा मार्ग स्वीकारल्याने नवरात्रात एखाददुसरा मोठा पाऊस पडण्याची अपेक्षा शेतकरी वर्गात आहे. एकूणच खरीप आणि रबी, असे दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

जालना जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्राजवळ असलेल्या घनसावंगी आणि अंबड तालुक्यांत यंदा उसाचे विक्रमी उत्पादन निघण्याची शक्यता आहे. याच भागात समर्थ, सागर व समृद्धी, हे तीन साखर कारखाने असल्याने याचा गळीत हंगाम दसऱ्यालाच प्रारंभ होणार आहे. आतापासून ऊसतोडणीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील रामेश्वर, बागेश्वरी सहकारी साखर कारखान्यांनीही गळीत हंगामाची तयारी सुरू केली आहे.

नवरात्रौत्सवामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण असले तरीही मोंढ्यासह अन्य बाजारपेठांत मात्र अद्याप खरेदीसाठी नागरिक बाहेर पडले नाहीत. उपवासाच्या साहित्याची दुकाने मात्र जागोजागी थाटली आहेत. दसऱ्यानिमित्त तयार कपड्यांची बाजापेठ सज्ज झाली असून, व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. नारळाचीही मागणी वाढणार आहे. मुंबई व परिसरातून जालन्यात मोठ्या प्रमाणात नारळाची आवक वाढली आहे.

शंभर भरतीचे चांगल्या दर्जाचे नारळ १ हजार ५३० रुपयांत एक पोते विक्री होत आहे. बाजारपेठेत गहू तीनशे पोती (भाव प्रति क्विं. १,९०० ते २,४०० रु.), ज्वारी पाचशे पोती (१,७०० ते २,५००), बाजरी तीनशे पोती (१,३०० ते २,०००), मूग पाचशे पोती (४,२०० ते ५,२००), उडीद पाचशे पोती (३,८०० ते ४,१५०), सोयाबीन ४,००० पोती (२,९०० ते ३,१००), मका, बाराशे पोती (१,१५० ते १,४००), साखरेचे प्रतिक्विंटल भाव ३,२५० ते ३,३५० रुपये असे आहे. साबुदाण्याचा दर प्रतिक्विंटल ४,६०० ते ५,००० एवढा असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, येणारे सण, उत्सवाच्या काळात महागाई वाढण्याची शक्यता असल्याने गृहिणी चिंताग्रस्त झाल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी