शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus: मोठा दिलासा! एप्रिलमध्ये प्रथमच बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 06:19 IST

CoronaVirus in Maharashtra: राज्यात शुक्रवारी दिवसभरात ६६ हजार ८३६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या मात्र ७४ हजार ४५ इतकी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात दुसऱ्या लाटेने एकीकडे नव्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, बरे होणाऱ्यांची संख्या मात्र कमीच असल्याचे चित्र होते. शुक्रवारची आकडेवारी मात्र थोडी दिलासादायक आहे. एप्रिल महिन्यात प्रथमच नव्या बाधित होणाऱ्यांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आली आहे.राज्यात शुक्रवारी दिवसभरात ६६ हजार ८३६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या मात्र ७४ हजार ४५ इतकी आहे. बाधित होणाऱ्यांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सुमारे सात हजारांपेक्षा जास्त आहे. या महिन्यात प्रथमच बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असून, हा कल पुढील काही दिवस कायम राहिल्यास, राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण नक्कीच कमी होईल. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७२२१ नवीन रुग्ण सापडले आहेत. 

दिवसभरात ७७३ मृत्यू n शुक्रवारी बाधित झालेल्या ६६ हजार ८३६ रुग्णांमुळे बाधितांची संख्या ४१ लाख ६१ हजार ६७६ झाली आहे, तर दिवसभरात ७४ हजार ४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ३४ लाख ४ हजार ७९२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. n यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.८१ एवढे झाले आहे. कोरोना मृत्युदर मात्र १.५२ टक्के इतका असून, दिवसभरात ७७३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. n आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ५१ लाख ७३ हजार ५९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४१ लाख ६१ हजार ६७६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१ लाख ८८ हजार २६६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर २९ हजार ३७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या