शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 06:00 IST

सृजनाला आवाहन करणारा, कवींना भुरळ घालणारा असा हा आनंदधन श्रावण. वातावरणातील प्रसन्नतेने आशादायी बदलांची सकारात्मक चाहूल देणारा श्रावण.

विजय बाविस्कर :

हासरा नाचरा जरासा लाजरा,

सुंदर साजिरा श्रावण आला,

तांबुस कोमल पाऊल टाकीत,

भिजल्या मातीत श्रावण आला 

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या काव्यपंक्ती आज आवर्जून आठवतायत... ज्येष्ठ-श्रेष्ठ कवींच्या प्रतिभेला बहर आणणारा, तनामनात चैतन्य फुलविणारा, पाचूसारखा हिरवागार श्रावण आजपासून सुरू होत आहे. सण-उत्सवांसह विविध व्रतवैकल्यांची रेलचेल असलेल्या श्रावणाच्या स्वागतासाठी सृष्टी सजली आहे. पावसाची आषाढ-झड थांबली आहे. बालकवींनी म्हटल्याप्रमाणे,

श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे,

क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे

असे रमणीय वातावरण आसमंतात आले आहे. श्रावण हा भारतीय वर्षगणनेतील पाचवा महिना. पौर्णिमेच्या सुमारास श्रवण नक्षत्र असते; म्हणून या महिन्याला श्रावण असे नाव. चातुर्मासातील श्रेष्ठ मास श्रावण म्हणजे सणसमारंभांच्या रूपाचे चैतन्यपर्व. शुद्ध आणि सात्त्विकतेचे आवरण पर्यावरण. घरगुती ते सार्वजनिक सणांचा हा महिना. प्रत्येकाच्या मनात श्रावणाचे रंग वेगळे असतात. महाराष्ट्राचे वाल्मीकी महाकवी ग. दि. माडगूळकरांचे

‘बरसू लागल्या रिमझिम धारा,

वारा फुलवी मोरपिसारा,

हलू लागली झाडे वेली नाच सुरू जाहला’ 

हे शब्द गुणगुणत महिलांनी मंगळागौरीच्या सणाची तयारी सुरू केली आहे. ‘रांधा- वाढा- उष्टी काढा’पासून नोकरदार महिलांपर्यंत परिवर्तन झाले, तरी श्रावण म्हणजे स्त्रीजीवनातील आध्यात्मिक, सांस्कृतिक विसावा. महिलांच्या कलागुणांना व्यक्त होण्यासाठी व श्रमपरिहारासाठी पूर्वजांनी कल्पकतेने याचा संबंध सण-उत्सवांशी जोडला आहे. रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल करून कष्ट, श्रम विसरतात आणि अधिक ताज्यातवान्या होतात. शुद्धपंचमीला नागाची पूजा केली जाते. कविवर्य गदिमा आणि भावगीतगायक गजाननराव वाटवे यांनी अजरामर केलेले 

‘फांद्यावरी बांधियले गं मुलिंंनी हिंदोले, 

पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’ 

हे गीत स्त्रीजीवनातील नागपंचमीचे महत्त्व सांगून जाते. निसर्गाशी एकात्मतेची व भूतदयेची  शिकवणही हा श्रावण देतो. नारळी पौर्णिमेला कोळी बांधव वरुणदेवतेप्रीत्यर्थ नदी वा समुद्राची पूजा करून त्यांना नारळ अर्पण करतात. याच दिवशी साजºया होणाऱ्या  रक्षाबंधनाला बहिणीला आपला भाऊराया भेटतो. बहीण भावाच्या हाताला राखी बांधून हे भावबंध अधिक दृढ करते. श्रावणी अमावास्येला पोळ्याचा सण साजरा करून बळीराजा बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढून कृषी संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. वद्य अष्टमीला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्मदिन जन्माष्टमी किंंवा कृष्णाष्टमी म्हणून साजरा केला जातो. नवमीला गोपाळकाल्याच्या दहीहंडी उत्सवात तरुणाई जल्लोषात न्हाऊन निघते.

सृजनाला आवाहन करणारा, कवींना भुरळ घालणारा असा हा आनंदधन श्रावण. वातावरणातील प्रसन्नतेने आशादायी बदलांची सकारात्मक चाहूल देणारा श्रावण. ज्येष्ठ हिंदी कवी हरिवंशराय बच्चन म्हणतात, 

है नियति-प्रकृति की ऋतुओं में संबंध कहीं कुछ अनजाना, 

अब दिन बदले, घड़ियाँ बदलीं, साजन आए, सावन आया।

नव्या उत्सवांचे नवे रंग, नवे उमंग हे आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य. ‘घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे’ म्हणत आनंदाची देवाण-घेवाण करणे हा तिचा मूलमंत्र आहे. विविध रंगांनी नटलेला मनभावन श्रावण आपल्यासाठी हा संदेश घेऊन पुन्हा आला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसNatureनिसर्गliteratureसाहित्य