शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

"मी आधीच म्हटलेलं, ही तीन मंदिरे आम्हाला मिळाल्यास...";  गोविंददेव गिरी महाराज यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 10:53 IST

पुण्यातील एका कार्यक्रमात गोविंददेव गिरी महाराज यांनी हे विधान केलं आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी काशी आणि मथुरेबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे.  अयोध्येनंतर काशी आणि मथुरा ही धार्मिक स्थळे शांततेत विलीन झाल्यानंतर आम्ही अन्य गोष्टी विसरून जाऊ, असं गोविंददेव गिरी महाराज यांनी म्हटलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात गोविंददेव गिरी महाराज यांनी हे विधान केलं आहे.

गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, मी आधीच सांगितले आहे की, तीन मंदिरे शांततेत मिळाल्यानंतर इतर मंदिरांकडे लक्ष देण्याची आमची इच्छाही नाही, कारण आम्हाला भविष्यात जगायचे आहे. भूतकाळात जगायचे नाहीय. त्यामुळे देशाचे भवितव्य चांगले व्हाव. त्यामुळे मी आधीच सांगितलेलं, ही तिन्ही मंदिरे (अयोध्या, काशी, मथुरा) समजूतदारपणाने आणि प्रेमाने मिळाली तर बाकीच्या सर्व गोष्टी आम्ही विसरून जाऊ, असं गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले.

आणखी एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, मी त्या लोकांनाही प्रेमाने समजावून सांगेन. बघा, या सगळ्या ठिकाणांसाठी एक गोष्ट सांगता येणार नाही. काही ठिकाणी समजूतदार लोक आहेत, तर काही ठिकाणी समजूतदार लोक नाहीत. जिथे परिस्थिती असेल तिथे त्याच पद्धतीने लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा, असं आवाहन गोविंददेव गिरी महाराज यांनी म्हटलं आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान अनेक धार्मिक स्थळांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच क्रमाने ते पुण्यातील आळंदीत पोहोचले, तिथे त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि श्री श्री रविशंकर आणि इतरही सहभागी झाले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर ५०० वर्षांनंतर राम मंदिराची निर्मिती झाली आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंदिराच्या गर्भगृहात रामललाचा प्राणप्रतिष्ठा करण्यात आला होता, परंतु सध्या मंदिराचे बांधकाम सुरू असून आगामी काही महिन्यात बांधकाम पूर्ण होईल. याशिवाय ज्ञानवापी आणि मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याGyanvapi Mosqueज्ञानवापी मशीद