शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Maharashtra Political Crisis : "केंद्राच्या दबावामुळेच राज्यपाल निर्णय घेत आहेत", नाना पटोलेंचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 16:29 IST

Maharashtra Political Crisis : राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला ) बहुमत चाचणीसाठी आदेश दिले आहेत. यावरून कॉंग्रेसचे नेते नाना पटोले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडी सरकारचा जोरदार सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले आहे. यात राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला ) बहुमत चाचणीसाठी आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आले असून भाजपच्या गोटातही मोठ्या हालचाली सुरु आहेत. यावरून कॉंग्रेसचे नेते नाना पटोले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्यपाल भाजपच्या अजेंड्यावर काम करत आहेत. आम्ही आज सुद्धा बहुमत चाचणीसाठी तयार आहोत. पण ही प्रक्रिया संविधानिक पद्धतीने पार पडली पाहिजे. केंद्राच्या दबावामुळेच राज्यपाल निर्णय घेत आहेत. विधानसभा कुस्तीचा आखाडा नाही. अजून १६ आमदारांबाबत प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपालांना एवढी कशाची घाई झाली आहे? केंद्र सरकारच्या दबावामुळे हे सुरु आहे. एवढी तत्परता विधानसभा अध्यक्षपद निवडणूक, १२ आमदारांच्या नियुक्तीत का नाही दाखवली, असा थेट सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे.

माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी राज्यपालांनी सांगितलं होते की, प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे आणि आता राज्यपाल बहुमत सिद्ध करायला सांगत आहेत. आमची काल पण तयारी होती आणि उद्याही बहुमत सिद्ध करण्याची तयारी आहे. पण राज्यपालाची भूमिका दुट्टपी आहे.आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. मला खात्री आहे की आम्हाला न्याय मिळेल, असेही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान,  एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याविषयी पत्र पाठवले आहे. विधीमंडळातील बहुमत चाचणीच्या विरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्याचे राजकारण आता निर्णायक स्थितीत आले आहे. शिवसेनेने राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयात आज (बुधवारी) संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे. शिवसेनेकडून वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी