शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या अध्यादेशावरून राज्यपाल-सरकार संघर्ष, विधि व न्याय विभागाच्या शेऱ्यावर ठेवले बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 12:10 IST

अध्यादेश मंजुरीसाठी राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठविला असता राज्यपालांनी विधि व न्याय विभागाच्या एका शेऱ्यावर बोट ठेवत राज्य शासनाकडून खुलासा मागविला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन केले.

मुंबई : ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण पुन्हा बहाल करण्यासंबंधीच्या अध्यादेशावर सही न करता त्याबाबत काही विचारणा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्याने राज्यपाल विरुद्ध सरकार असे संघर्षाचे चित्र पुन्हा एकदा समोर आले. विशेष अधिवेशनावरून  ‘राजभवन विरुद्ध राज्य सरकार’ असा संघर्ष बघायला मिळाला होता. 

अध्यादेश मंजुरीसाठी राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठविला असता राज्यपालांनी विधि व न्याय विभागाच्या एका शेऱ्यावर बोट ठेवत राज्य शासनाकडून खुलासा मागविला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन केले. राज्यपाल हे ओबीसी विरोधी असल्याचे चित्र सत्तापक्षाकडून तयार केले जात आहे. उलट राज्यपालांनी केलेली विचारणा ही ओबीसी हिताची आहे. कारण, विधि व न्याय विभागाचे मत डावलून अध्यादेश काढल्यास तो न्यायालयात टिकणार नाही म्हणून ओबीसी हितासाठी राज्यपालांनी विचारणा केली, असे फडणवीस म्हणाले. राज्यपालांनी केलेल्या विचारणेवर उत्तर दिले असते आणि शक्ती कायदा आधीच राज्यात आणला असता तर परिपक्वता दिसली असती पण मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अपरिपक्व दिसतात, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. 

बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यपालांनी ओबीसींबाबतचा अध्यादेश परत पाठविणे हे ओबीसींचे आरक्षण घालविण्याचे भाजपचे प्लॅनिंग आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र, राज्यपालांवर टीका करणे योग्य नाही. त्यांनी काही विचारणा शासनाकडे केली आहे त्यानुसार त्यांना उत्तर दिले जाईल, असे सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र राज्यपालांवर ओबीसी अध्यादेश अडविल्याबद्दल टीका केली आहे.

शासनाचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले राजभवनावर- अध्यादेशासंदर्भात राज्यपालांनी विचारणा केलेल्या बाबींची पूर्तता करण्यासाठी शासनाचे वरिष्ठ अधिकारी सायंकाळी राजभवनवर गेले. राज्यपाल कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यामुळे आता अध्यादेश लवकरच काढला जाईल अशी शक्यता आहे. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी