शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

“केवळ नोकरीच्या मागे लागू नका, कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणा”: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 21:07 IST

केवळ नोकरीच्या मागे लागू नका, कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

रत्नागिरी: आताच्या घडीला महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या वतीने विधान परिषदेसाठी १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी करण्यात आलेल्या शिफारसीवर अद्यापही निर्णय न झाल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. यातच केवळ नोकरीच्या मागे लागू नका, कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. (governor bhagat singh koshyari urged agriculture graduates make efforts for new agricultural revolution) 

TATA चा धुमाकूळ! ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत नोंदवली ५३ टक्के वाढ; बड्या कंपन्यांना धोबीपछाड

कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे ३९ वा पदवीदान समारंभ संपन्न झाला. यावेळी कुलगुरू संजय सावंत यांच्यासह इतर मान्यवर देखील हजर होते. या सोहळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कृषी राज्यमंत्री दादा भुसे यांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली होती. पदव्युत्तर पदवीच्या १३२, पीएचडीच्या ३० आणि पदपीपूर्व अभ्यासक्रमाच्या १९२५ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. यावेळी गोल्ड मेडेलिस्ट आणि पीएचडी घेणारे विद्यार्थी प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजर होते. तर उर्वरित विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने पदवी बहाल करण्यात आली.

जबरदस्त! UPI द्वारे ऑगस्टमध्ये ३.५५ अब्जांचे व्यवहार; ९.५६ टक्क्यांची वाढ PhonePe आघाडीवर

कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणा

प्राचीन काळी भारत हा कृषीप्रधान देश होता. देशात दुध-दह्याच्या नद्या वाहत होत्या. कृषी व कृषीवर आधारित उद्योग, फलोत्पादन यांमुळे देश संपन्न होता. मधल्या काळात देशाने अनेक दुष्काळ पहिले परंतु त्यानंतर हरित क्रांती आली. अलीकडच्या काळात सफेत क्रांती व नील क्रांतीच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. भारत अन्नधान्य उत्पादन, दुग्ध उत्पादन व मत्स्य उत्पादनांच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदार देखील झाला आहे. कृषी क्षेत्रांत नैसर्गिक शेती, पेटेंट, भौगोलिक मानांकन यांमुळे शेतकऱ्यांसाठी समृद्धीची नवनवी दालने उघडत आहेत. अशावेळी कृषी क्षेत्रातील पदवीधारकांनी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात नवी क्रांती आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. 

TATA ग्रुपचा मोदी सरकारला पाठिंबा; एलन मस्कच्या ‘त्या’ मागणीला केला जोरदार विरोध

दरम्यान, कृषी विद्यापीठांमध्ये नवनवे संशोधन होत असून आपण नुकतेच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधन पाहून आल्याचे राज्यपालांनी सांगितले. या संशोधनामुळे आपण प्रभावित झाल्याचे सांगून हे संशोधन प्रयोगशाळेतून शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.   

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीRatnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीagricultureशेती