शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

राज्यपालांचे वादग्रस्त विधान, शिवसेनेचा मनसेला टोला; राज ठाकरेंवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 11:11 IST

राज्यपालांनी राज्याचा अवमान केल्याप्रकरणी त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. महाराष्ट्राबद्दल इतके अवमानकारक वाक्य राज्यपाल करतात अशी टीका शिवसेनच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

मुंबई - महामहिम राज्यपाल हे संविधानिक पद आहे. राज्यपालांनी राज्याची जबाबदारी पालक या नात्याने कुठलाही आकस न ठेवता पार पाडायची असते. राज्यपाल पक्षपातीपणे काम करतात. आधी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी विधान केले आणि आता अशाप्रकारे वादग्रस्त विधान केले. महाराष्ट्राला घडवण्यासाठी मराठी माणसाने कष्ट केले. गिरणी कामगारांनी घाम सांडला आहे. कष्टकरी वर्ग हा मराठी माणूसच होता असा घणाघात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर केला. 

सुषमा अंधारे म्हणाल्या की, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी पक्षपाती राजकारण सुरू आहे. केवळ राज्याला बदनाम करण्यासाठी अशी विधाने केली जातात. बाहेरचे राज्यातील लोक इथे येतात तेव्हा तेथील राज्यकर्ते तिथल्या लोकांना रोजगार देण्यास कमी पडले हे दिसून येते. राज्यपालांचे विधान महाराष्ट्राला तोडण्यासारखं आहे. ज्यांचा इतिहास आमच्या धमण्यातून वाहतोय त्यांच्याबद्दल जाणीवपूर्वक वाक्य करायची. अखंड महाराष्टाला तुकडे तुकडे करण्याचं राजकारण सुरू आहे. राज्यपालांनी कुठलेही विधान करताना जबाबदारीने केले पाहिजे. परंतु तसे होत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच राज्यपालांनी राज्याचा अवमान केल्याप्रकरणी त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. महाराष्ट्राबद्दल इतके अवमानकारक वाक्य राज्यपाल करतात. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा असं ओरडून सांगणारे, आमच्याच पक्षातून गेलेले, स्वयंघोषित महाराष्ट्राचा मसीहा म्हणवणारे राज ठाकरे राज्यपालांना सुनावणार की भाजपासोबत सरकारमध्ये बसणार? बाळासाहेबांच्या विचारसरणीचा अपमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहन करणार आहेत का? राज्यपालांनी संबंध महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. 

दरम्यान, राज्यपाल कमी परंतु भाजपा नेते म्हणून भगतसिंग कोश्यारी जास्त वावरतात. राज्यपालांचा जीव महाराष्ट्रात रमत नसेल तर पंतप्रधानांनी त्यांना परत बोलावून पक्षकार्य सांभाळण्यास सांगावे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना परत बोलावण्याची शिफारस केंद्राला करावी. महाराष्ट्राची माफी राज्यपालांना मागावीच लागेल. तोपर्यंत राज्यपालांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायला हवा असंही शिवसेनेने म्हटलं. 

टॅग्स :MNSमनसेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShiv Senaशिवसेना